शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

खेडमध्ये ‘स्वाइन’चा अलर्ट

By admin | Updated: February 21, 2015 00:32 IST

स्वाइन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून आज आरोग्य विभागाने पंचायत समितीमध्ये दिवसभर कार्यशाळा घेऊन तालुक्यात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

राजगुरुनगर : खेड तालुक्यात स्वाइन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून आज आरोग्य विभागाने पंचायत समितीमध्ये दिवसभर कार्यशाळा घेऊन तालुक्यात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. मरकळ येथील अहिल्या किसन लोखंडे (वय ५५) यांचा आज आणि राजगुरुनगर येथील गजानन दत्तात्रय कांबळे (वय ३२, रा. वृंदावन सोसायटी) या दोघांचा स्वाइन फ्लूमुळे १८ तारखेला मृत्यू झाला. लोखंडे यांचा यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर आलेल्या चाचणीत त्यांना स्वाइन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले; तर कांबळे पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले, पण ते वाचू शकले नाहीत, अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी एस. आर. गोरे यांनी दिली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर खेड पंचायत समितीत सभापती सुरेश शिंदे, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रशांत शिंदे, गटविकास अधिकारी अजिंक्य पवार आणि तालुका आरोग्याधिकारी एस. आर. गोरे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा झाली. कार्यशाळेला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक व सहायिका, गटप्रवर्तक आणि ‘आशा’ कार्यकर्ती मिळून सुमारे ५०० जण उपस्थित होते. स्वाइन फ्लू होऊ नये, म्हणून घ्यावयाची काळजी, लक्षणे आणि झाल्यावर करावयाची उपाययोजना याबाबत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रतिबंधक उपाय म्हणून स्वच्छता पाळावी आणि तोंडाला रुमाल बांधावा आदी सूचना करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)स्वाइन फ्लूबाबत माहिती देणारी २०००० पत्रके आरोग्य विभागाने छापली असून त्यांचे तालुक्यात गावोगावी वितरण करण्यात येणार आहे. ताप, शिंका, सर्दी, डोकेदुखी, खोकला, घसादुखी, अतिसार, मळमळ, उलट्या अशक्तपणा, अंगदुखी, धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित औषोधोपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे.अहिल्या किसन लोखंडे (५५, रा. मरकळ, ता. खेड ) यांना मंगळवारी वायसीएममध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्यामुळे, त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी मिळाल्याने त्यांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आजाराचे निदान लवकर न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.