शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती...’!

By admin | Updated: March 27, 2015 00:30 IST

‘काव्य नव्हे अमृतसंचय...’ अशा विशेषणांनी पिढ्यानपिढ्या रसिकमनावर संस्कारक्षम बीजांची पेरणी करणारी अजरामर कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण.’ ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ ,

पुणे : ‘काव्य नव्हे अमृतसंचय...’ अशा विशेषणांनी पिढ्यानपिढ्या रसिकमनावर संस्कारक्षम बीजांची पेरणी करणारी अजरामर कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण.’ ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ , ‘सरयू तीरावरी या, दशरथा घे हे पायसदान’ आणि ‘राम जन्मला ग सखे,’ अशा गीतांच्या सुरेल गुंफणीतून गीतरामायणाचा सुरेल काळ रसिकांच्या नजरेसमोर तरळला. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव म्हणून घराघरांत लोकप्रिय झालेल्या ‘गीतरामायणा’ स यंदाच्या रामनवमीस साठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारतीय शिक्षण मंडळातर्फे गरवारे महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित गीतरामायणाच्या खास हीरकमहोत्सवी सोहळ्याचे. हजारो रसिकांच्या उपस्थितीत ‘गदिमा’ यांचे लेखन आणि बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांच्या अद्वितीय संगीतातून साकार झालेल्या गीतरामायणाच्या सोहळ्यास या प्रतिभावंत द्वयीबरोबर काम केलेल्या ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे, बाबूजींचे चिरंजीव आणि गायक व संगीतकार श्रीधर फडके, गदिमांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. याप्रसंगी अभय केले, निरामय वेलनेसचे योगेश आणि अमृता चांदोरकर, संतोष पोतदार, धनंजय कुलकर्णी व भारतीय शिक्षण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. गीतरामायणातील प्रत्येक गीत हे दृश्य आणि कडवं हे उपदृश्य आहे. बाबूजींनी गीतरामायण रचले ते शास्त्रीय संगीतावर. जवळपास ३३ रागांचा त्यात समावेश त्यांनी केला होता, अशा गीतरामायणातील प्रत्येक गीतरचनेचे सौंदर्य उलगडत संगीतकार श्रीधर फडके यांनी, ‘सरयू तीरावरी दशरथा घे हे पायसदान’ आणि ‘राम जन्मला ग सखे,’ ‘सावळा ग राम ज्येष्ठ तुझा पुत्र’, ‘चला राघव’, ‘रामा चरण तुझे’, ‘आकाशाशी जडले नाते’ ‘निरोप कसला माझा घेता,’ ‘थांब सुमंता’, ‘नकोस नौके परत फिरु’, अशा गीतरामायणातील गीतांचे सादरीकरण करून रसिकांच्या मनात गीतरामायणाच्या स्मृती जागृत केल्या. या वेळी त्यांना तुषार आंग्रे (तबला), उद्धव कुंभार ( तालवाद्य), किमया काणे व विनय चेउलकर (सिंथेसायझर ) यांनी साथसंगत केली. गीतरामायणाचे ओघवत्या शैलीत अत्यंत रसाळ निवेदन धनश्री लेले त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले. संस्कृत पंडित सी. भा. दातार यांनी संस्कृतमध्ये अनुवादित केलेली गीतरामायणातील चार गाणी नूपुर देसाई, तन्वी केळकर, मिताली जोशी आणि रोहित गुळवणी या सांगलीच्या बालकलावंतांनी सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन दीपक पाटणकर यांनी केले. या वेळी टाळ्यांच्या प्रचंड गजरात श्रोत्यांनी या बालकलावंतांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)