शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत शेती, अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:08 IST

पुणे : शेतकऱ्यांना भात लागवडीमधून अधिक उत्पादन मिळावे, तसेच नवीन तंत्रज्ञानातून कमी खर्चात अधिक फायदा व्हावा, यासाठी वेल्हे तालुक्यात ...

पुणे : शेतकऱ्यांना भात लागवडीमधून अधिक उत्पादन मिळावे, तसेच नवीन तंत्रज्ञानातून कमी खर्चात अधिक फायदा व्हावा, यासाठी वेल्हे तालुक्यात रेनट्री फाउंडेशनकडून शेतकरी शाळा घेण्यात येत आहेत. भात हे वेल्हा तालुक्यातील प्रमुख पीक असल्याने शेतकऱ्यांना या शेती शाळांचा चांगला फायदा होत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील ९ गावांमध्ये परसबागेतून घरच्या घरी भाज्या पिकविण्याचे प्रशिक्षणही रेनट्री फाउंडेशनतर्फे दिले जात आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या नवीन पद्धती शिकवून स्वयंपूर्ण बनवणे आणि शाश्वत शेतीचे उद्दिष्ट साधणे

हा या प्रशिक्षणाचा हेतू आहे. रेनट्री फाउंडेशन वेल्हे तालुक्यात गेली २ वर्षे काम करत आहे.

शेतकऱ्यांसाठी ‘रेनट्री’तर्फे फिल्ड स्कूल म्हणजे शेती कार्यशाळा घेतल्या जातात. त्यामध्ये वेल्हा तालुक्यातील ९ गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. भाताचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना ‘सिस्टिम ऑफ राइस इनटेन्सिफिकेशन’ (श्री पद्धत) शिकवण्यात आली आहे. या पद्धतीत कमी पाणी, कमी खर्च आणि शाश्वत शेतीमधून अधिक उत्पादन काढले जाते. भात लागवडीसाठी सघन भात लागवड ही पद्धत शेतकऱ्यांना सांगितली आहे. आपल्याकडेही खूप केली जात नाही. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. सुमारे २५ बाय २५ सेंटीमीटरमध्ये रोपांची लागवड करण्यात येते. अनेकदा शेतकरी भात रोपांची मोठी जुडी लावतात, आम्ही फक्त पाच रोपटी लावायला सांगितली. त्याला फुटवे अधिक येतात आणि सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. परिणामी, उत्पादन दीडपटीने वाढते, अशी माहिती रेनट्रीकडून दिली.

—————

११० कुटुंबांनी घेतला परसबागेचा लाभ

वेल्हा तालुक्यातील अनेक कुटुंबीयांना लॉकडाऊन काळात भाजीपाला मिळत नव्हता. या काळात त्यांना परसबागेची संकल्पना शिकवली गेली. याबाबत डॉ. संतोष सहाने यांनी या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. सुमारे ११० कुटुंबांनी यात सहभाग घेऊन १४ प्रकारच्या भाज्या लावल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये या परसबागेचा उपयोग झाला.

—————————-

मी श्री पद्धतीने भाताची लागवड केली. त्यामुळे मला अधिक उंचीचे भात रोप आणि अर्ध्या फुटापर्यंत लांब लोंब्या मिळाल्या आणि उत्पन्न वाढले. कमी खर्च, अधिक उत्पन्न मिळाले आहे.

- अजुर्न रांजणे, शेतकरी, साखर गाव, ता. वेल्हा

-------------------