शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

निवडणूक यंत्रणेवरच संशय

By admin | Updated: February 9, 2017 03:36 IST

महापालिका निवडणुकीतील प्रभाग ७ ड मधील उमेदवार रेश्मा भोसले यांची अपक्ष म्हणूनच उमेदवारी ग्राह्य धरण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत

पुणे : महापालिका निवडणुकीतील प्रभाग ७ ड मधील उमेदवार रेश्मा भोसले यांची अपक्ष म्हणूनच उमेदवारी ग्राह्य धरण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर त्यांना भाजपाची उमेदवारी देण्याचा निर्णय न्यायालयाने स्थगित ठेवला आहे. एका उमेदवारासाठी विशेष बाब म्हणून सर्व प्रशासकीय यंत्रणा चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतरही प्रभागात राजकीय दबावाने निवडणूक यंत्रणेने काम केल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांनी केला. भोसले यांनी भाजपाकडून भरलेल्या उमेदवारी अर्जात विसंगती आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी अपक्ष ठरविले होते. मात्र महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठविल्यावर भाजपाची उमेदवारी बहाल करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अर्जाबाबत निर्णयाचे संपूर्ण अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले असताना हस्तक्षेप करण्यात आल्याचे अ‍ॅड. अंतूरकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे अपक्ष म्हणूनच उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात यावा, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे भाजपाचा पर्दाफाश झाला असून जनतेचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्णयातून आयुक्त भाजपासाठी काम करीत असल्याचे दिसते, असे बहिरट यांनी सांगितले. भवानी पेठ कार्यालयात राजकीय हस्तक्षेपाचा आरोपपुणे : उमेदवारी अर्ज रद्द करण्याबाबत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर उमेदवारांकडून शंका व्यक्त केली जात आहे. राजकीय हस्तक्षेपातून काही प्रभागांमध्ये किरकोळ कारणांवरून अर्ज रद्द केले असल्याची तक्रार करण्यात येत आहे.भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक १९ ब मध्ये काँग्रेसच्या सुनीता जगन्नाथ लडकत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नसीम अन्वर शेख व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वंदना सिद्राम जन्नू या तीन महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले. सुनीता लडकत यांचा अर्ज त्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी दाखल्यावर माहेरचे नाव आहे, विवाहानंतर नाव बदललेले असल्याचा पुरावा दिलेला नाही, या कारणावरून फेटाळण्यात आला. हेच कारण सांगत जन्नू व नसीम शेख यांचेही अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे ते निवडणुकीतून बाद झाले.आपण सर्व आवश्यक कागदपत्रे जोडली होती, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती पाहिलीच नाहीत, न पाहताच त्यांनी उमेदवारी अर्ज बाद केले, त्यावर कोणीही अन्य उमेदवार किंवा त्याच्या कार्यकर्त्याने हरकतही घेतलेली नव्हती, असे या महिलांचे म्हणणे आहे. जात पडताळणी प्रमाणपत्रावरचे नाव माहेरचे असणे स्वाभाविक आहे, ते विवाहानंतर बदलले असल्याचे व त्यासंबंधीचा अर्ज केला असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यानंतरही अर्ज रद्द करण्यात आले, अशी त्यांची तक्रार आहे. तीन महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे अर्ज बाद करण्यामागे राजकीय हात असल्याचा या तिन्ही महिलांचा आरोप आहे. या प्रभागात फक्त भाजपाच्या मनीषा लडकत व शिवसेनेच्या भारती दामजी व अन्य एक महिला असे तीनच अर्ज शिल्लक राहिले यावरून त्याला पुष्टी मिळत असल्याचे अर्ज रद्द करण्यात आलेल्या तिन्ही महिला उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यापैकी लडकत यांनी न्यायालयात दाद मागितली असून अन्य दोन उमेदवारही त्याच तयारीत आहेत.