शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

स्मार्ट सिटीच्या कामात पक्षनेत्यांचा अडसर, परवानगीचे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:24 IST

विकासकामे गतिमानतेने व्हावी, यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी महापालिकेनेच स्थापन केली

पुणे : विकासकामे गतिमानतेने व्हावी, यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी महापालिकेनेच स्थापन केली, मात्र कंपनीच्या कामांसाठीच्या परवानगीचे विषय पक्षनेत्यांच्या बैठकीपुढे आणण्याचे बंधन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर घालण्यात आले आहे. तसा ठरावच पक्षनेत्यांच्या बुधवारी झालेल्या सभेत करण्यात आला.या ठरावानुसार आता स्मार्ट सिटी कंपनीला महापालिकेच्या जागेत त्यांच्या विशेष कार्यक्षेत्रासह (औंध, बाणेर, बालेवाडी) शहरात कुठेही कोणताही प्रकल्प सुरू करायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम पक्षनेत्यांच्या बैठकीत प्रस्ताव ठेवावा लागेल. तिथे चर्चा होऊन मान्यता मिळाल्यानंतर तो सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवला जाईल. यात कंपनीच्या कामांना दिरंगाई होणार आहे. पक्षनेत्यांपैकी बहुतेक जण कंपनीच्या संचालक मंडळातआहेत. तरीही असा ठराव करण्यात आला आहे.महापौर मुक्ता टिळक यांनी या निर्णयाची माहिती दिली. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेच्याच संमतीने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी स्थापन करण्यात आली आहे. महापालिकेत विविध स्तरावरील परवानग्या व फाईलमध्ये विकासकामे अडकून दिरंगाई होऊ नये, असा उद्देश त्यामागे होता. त्यालाच आता पक्षनेत्यांनी हरताळ फासल्याचे या निर्णयावरून दिसते आहे. पुन्हा हा प्रस्ताव पक्षनेत्यांपुढे कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनीच ठेवावा, असेही बंधन आहे. स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेची परवानगी न घेता शहरात १७७ पेक्षा जास्त ठिकाणी व्हीएमडी हे सामाजिक संदेश देणारे डिजिटल फलक उभारले आहेत. त्यासाठी त्यांनी खासगी कंपनीचे सहकार्य घेतले आहे. एरवी महापालिका अशा फलकांसाठी शुल्क आकारणी करीत असते. यात मात्र शुल्क आकारणी करण्याचा प्रश्नच आला नाही कारण कंपनीने फलक उभे करताना महापालिकेला परवानगीच मागितलेली नाही. त्यावरून झालेल्या वादामधूनच पक्षनेत्यांनी आता ठराव केला असल्याची चर्चा आहे.