शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

६६ गावांमधील पीक कर्ज वसुलीस स्थगिती

By admin | Updated: April 26, 2016 01:30 IST

पन्नास पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांकडून पीक कर्ज वसुली करण्यास राज्यशासनाने स्थगिती दिली आहे.

पुणे : पन्नास पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांकडून पीक कर्ज वसुली करण्यास राज्यशासनाने स्थगिती दिली आहे. त्याचा फायदा पुणे जिल्हयातील ६६ गावांना मिळणार आहे. या गावांमधील शेतकऱ्यांकडून पीक कर्जाची वसुली करण्यात येणार नाही आणि या शेतकऱ्यांना नव्यानेही पीक कर्ज मिळणार आहे. ही ६६ गावे शिरूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जाचा कालावधी एकाच वर्षांचा असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सातत्याने दुष्काळ आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली होती. पीक कर्ज घेऊन खरीपाची केलेली पेरणी पावसाअभावी जळून गेली आणि शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. त्यामुळे पीक कर्जाची परतफेडक कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. त्यामुळे या वसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार कर्जाच्या वसूलीस शासनाने स्थगिती देण्याचा निर्णय गेल्या आठवडयात घेतला होता. पुणे जिल्ह्यातील सर्व कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांच्या कजार्चे पुनर्गठण करून नव्याने कर्ज उपलब्ध करून घेण्याकरिता संमतीपत्रासह संबंधीत बँकेशी अथवा संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामिण जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी केले आहे.