शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

चोवीस तास पाणीपुरवठा कामाला स्थगिती

By admin | Updated: March 17, 2017 03:11 IST

महापालिकेमध्ये सत्तांतर होऊन भाजपाचे महापौर सत्तारूढ झाले असतानाच राज्य शासनाने २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू

पुणे : महापालिकेमध्ये सत्तांतर होऊन भाजपाचे महापौर सत्तारूढ झाले असतानाच राज्य शासनाने २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकी बांधकामाला शासनाचे उपसचिव स. श. गोखले यांनी स्थगिती देण्याचे आदेश काढले. यामुळे २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या कामाला मोठा फटका बसणार आहे.शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे. याअंतर्गत शहरात ८५ नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. या टाक्या बांधण्याचे काम एकाच कंपनीला जास्तीच्या दराने देण्यात आल्याचा प्रश्न विधान परिषदेमध्ये आमदार अनिल भोसले, अनंत गाडगीळ यांनी मांडला होता. पाण्याच्या टाकी बांधकामासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियांची शासनाकडून चौकशी करण्यात येईल. चौकशी पूर्ण होईपर्यंत टाक्यांचे बांधकाम करू नये, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. महापालिका निवडणुकांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून पाण्याच्या टाक्यांचे काम सुरू करण्यात आले होते.पाण्याची टाकी बांधकामासाठी सुरुवातीला ६ स्वतंत्र टेंडर काढण्यात आले होते. मात्र अचानक ही टेंडर प्रक्रिया रद्द करून सर्व ८५ टाक्या बांधण्याचे एकच टेंडर प्रशासनाकडून काढण्यात आले. एका विशिष्ट कंपनीला हे टेंडर मिळावे यासाठी निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या निविदा प्रक्रियेविरोधात आमदार अनिल भोसले व अनंत गाडगीळ यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठविला होता.पुणेकरांना फटकाशहरातील २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम ५ वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन पुणेकरांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आली होती. त्या वेळी २४ तास पाणी देण्यापूर्वीच करात वाढ का, असा प्रश्न विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात आला होता. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ५ वर्षांत पुणेकरांना २४ तास पाणी मिळेल, अशी ग्वाही आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली होती. मात्र, शासनाकडून पाण्याच्या टाकी बांधकामाला स्थगिती दिल्याने आता ही योजना चांगलीच रखडणार आहे.आकसबुद्धीने निर्णय ४राज्य शासनाने २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ८५ पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम थांबविण्याचा निर्णय आकसबुद्धीने घेतला आहे. महापालिकेतील मागच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेली कामे स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.पाणीपुरवठा विभाग संशयाच्या भोवऱ्यात४पाणीपुरवठा विभागाने ८५ पाण्याच्या टाक्या बांधकामासाठी पहिल्यांदा ६ वेगवेगळ्या निविदा काढल्या होत्या. ४मात्र अचानक एकाच कंपनीला काम देण्यासाठी ही निविदा प्रक्रिया रद्द करून सर्व कामांची एकच निविदा काढली, असा आरोप विधान परिषदेमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.