शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

कुकडीतून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती

By admin | Updated: March 21, 2016 00:41 IST

कुकडी प्रकल्पातून घोड धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयास जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने स्थगिती दिली आहे. धरणांमध्ये शिल्लक असलेले कमी पाणी, उन्हाळी परिस्थिती

घोडेगाव : कुकडी प्रकल्पातून घोड धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयास जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने स्थगिती दिली आहे. धरणांमध्ये शिल्लक असलेले कमी पाणी, उन्हाळी परिस्थिती, पाणी सोडण्यास होणारा वहनव्यय व बाष्पीभवन याचा विचार करता पाणी शेवटपर्यंत पोहोचणार नाही, त्यामुळे पाणी सोडणे योग्य नाही, असा निर्णय प्राधिकरणाने दिला आहे. कुकडी प्रकल्पातून घोड धरणात पाणी सोडले जावे यासाठी राजेंद्र नागवडे व श्रीनिवास घाडगे यांनी २७ आॅक्टोबर २०१५मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १.६ टीएमसी पाणी घोड धरणात सोडले जावे, असा निकाल दिला. या निकालाच्या विरुद्ध आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी उच्च न्यायालयात अपील करून दि.१६ मार्च २०१६ पर्यंत स्थगिती मिळवली होती. यावर दि.१७ मार्च रोजी सुनावणी झाली, यामध्ये कुकडी प्रकल्पातील चार धरणांत मुखाशी पाणीसाठा आहे, तर डिंभे धरणात २५ टक्के पाणी उपलब्ध आहे. सध्याची उन्हाळी परिस्थिती विचारात घेता पाणी सोडल्यास गळती व बाष्पीभवनामुळे शेवटपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे पाणी सोडणे योग्य होणार नाही, असे सांगत प्राधिकरणाने पाणी सोडण्यास स्थगिती दिली. देवदत्त निकम यांनी सांगितले, की आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यांतील तमाम शेतकऱ्यांसाठी आपण दाखल केलेल्या अपिलावर हा निर्णय झाला आहे. घोड धरणात पाणी सोडण्यास प्राधिकरणाने स्थगिती दिली आहे. आमच्या याचिकेमुळे १.६ टीएमसी पाणी वाचले असून, या निर्णयामुळे आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यांत उत्साहाचे वातावरण आहे.