शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

सर्व्हे झाले; उपाययोजनांचे काय?

By admin | Updated: May 10, 2017 03:48 IST

बारामती, पुरंदर; तसेच भोर तालुक्याला वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन भाटघर आणि नीरा-देवघर या धरणांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : बारामती, पुरंदर; तसेच भोर तालुक्याला वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन भाटघर आणि नीरा-देवघर या धरणांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या नाशिकच्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर नाशिक (मेरी) या संस्थेने धरणातील गाळाचे सर्वेक्षण केले होते. मात्र, गाळ काढण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. धरणात जवळपास १० टक्के गाळ साचला असून, तो बाहेर काढल्यास पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. भोर तालुक्यात १९२७ साली ब्रिटिशांनी वेळवंडी नदीवर भाटघर धरण बांधले. धरणाची पाणी साठवण क्षमता २२ टीएमसी असून, पाण्याचा फुगवटा सुमारे ५५ किलोमीटरपर्यंत पसरतो. धरण बांधून ९० वर्षे झाली. मात्र, अद्याप एकदाही धरणातील गाळ काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. ग्रामीण भागातील उंचीवर असलेल्या डोंगर दऱ्यातील माती उताराने ओढे, माती, पालापाचोळा झाडेझुडपे दगडगोटे दरवर्षी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येतात. यामुळे धरणात गाळाचे थरच्या थर साचले आहे. धरणात सुमारे ८ ते १० टक्के गाळच साचला आहे. हा गाळ बाहेर काढला तर धरणातील पाणीसाठा वाढणार आहे. सध्या भाटघर धरणात १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा सर्व गाळ असून धरणाने तळ गाठला आहे. मात्र, धरणातील गाळ काढला तर हाच पाणीसाठा दुप्पट होणार आहे. त्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. नीरादेवघर धरण बांधून २० वर्षे झाली. धरणात १२ टीएमसी पाणीसाठा होतो. मात्र, मागील २० वर्षांत एकदाही गाळ काढला नसल्याने धरणात गाळाचे थर साचले आहेत. यामुळे धरणातील पाणीसाठा कमी दिसत आहे. सदरच्या दोन्ही धरणांतील गाळ काढल्यास धरणात ८ ते १० टक्के पाणीसाठा वाढणार आहे.धरणातील गाळ काढण्याचे सध्या शासनाचे धोरण असून, तसे झाल्यास भोर तालुक्यातील दोन्ही धरणांतील १५ ते २० टक्के पाणीसाठा वाढणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, धरणातील गाळ काढणे गरजेचे आहे.