शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

‘सर्जिकल’मुळे सैनिकांचे मनोबल वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 04:07 IST

आपले शेजारील राष्ट्र पाकिस्तानच्या वाढत्या कारवाया, दहशतवादी हल्ले यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. शांततामय अशा आपल्या प्रतिमेचा गैरफायदा घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचे होते.

पुणे : आपले शेजारील राष्ट्र पाकिस्तानच्या वाढत्या कारवाया, दहशतवादी हल्ले यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. शांततामय अशा आपल्या प्रतिमेचा गैरफायदा घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचे होते. आपण त्यांच्यापेक्षा कुठेही कमी नसून जम्मू काश्मीरमधील उरी येथे झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे सैनिकांचे मनोबल वाढल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली.बालगंधर्व रंगमंदिरात येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. सर्जिकल स्ट्राइकमध्ये सहभागी असलेले लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार अहिर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर उपस्थित होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. अहिर म्हणाले की, निंभोरकर यांच्या आजवरच्या कामगिरीत सर्जिकल स्ट्राइकचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे. शांतताप्रिय भूमिका स्वीकारणाºया भारताबद्दल शेजारील राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीपासून पाकिस्तानच्या कारवाया आणि कुरापती सुरु आहेत. मात्र आपले सैन्य त्यांना पुरून उरले असून, जशास तसे उत्तर देण्यात निंभोरकर यांच्यासारख्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.उरीमधील सैनिकांवर झालेला हल्ला हे आपल्यापुढे मोठे आव्हान होते. यामुळे एक प्रकारची भीती पसरली होती. सर्जिकल स्ट्राइकमुळे सैन्यात आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली. पाकिस्तान, बांगलादेश, चीन या देशांलगत असलेल्या सीमारेषेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्क राहावे लागणार असून, म्यानमारमधून भारतात येणाºया रोहिंग्याच्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविले आहे.सत्काराला उत्तर देताना निंभोरकर यांनी युद्ध, युद्धातील थरारक प्रसंग, आठवणी यांना उजाळा दिला. सीमेवर देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची लढण्याची प्रेरणा असामान्य असते. माणुसकी, आदेश पाळण्यासाठी जिवाची किंमत मोजणारे सैनिक, शब्दालाप्राणापेक्षा जास्त महत्त्व, बांधिलकीहे सगळे सैनिकांमध्ये पाहावयास मिळते. खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, आबा बागुल, सतीश देसाई, संजय नहार, सुनील महाजन आदी मान्यवर श्रोत्यांमध्ये उपस्थित होते.