शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

तरुणांच्या नवीन प्रयोगांना पाठबळ द्या

By admin | Updated: April 10, 2016 04:16 IST

आपल्या लोकसंख्येमुळे आणि जागतिक परिस्थितीमुळे सध्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपली तरुण पिढी अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करत असून, त्यांना पाठबळ देण्याची गरज

पुणे : आपल्या लोकसंख्येमुळे आणि जागतिक परिस्थितीमुळे सध्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपली तरुण पिढी अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करत असून, त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशनतर्फे (जितो) आयोजित जितो कनेक्ट २०१६ या तीनदिवसीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक परिषदेचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अजय संचेती, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी, जितो झोन चेअरमन राजेश साकला, प्रसिद्ध विधितज्ज्ञ एस. के. जैन, उद्योगपती रसिकलाल धारिवाल, जितो अपेक्सचे पदाधिकारी तेजराज गुलेचा, राकेश मेहता, विजयकांत कोठारी, धीरज कोठारी, नरेंद्र छाजेड, अजित सेठिया आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, @‘‘ भारत हा सर्वाधिक युवकांची संख्या असलेला देश आहे. जगात अन्यत्र अर्थव्यवस्था संकटात असताना भारत मात्र प्रगती करत आहे. त्यामुळे आपल्याला जगभरात संधी निर्माण झाल्या आहेत. आपल्याकडे उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. तरुण पिढी जे प्रयोग करत आहे त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे आणि जितोसारख्या संघटनाच हे काम सर्वाधिक चांगल्या प्रकारे करू शकतात.गोयल म्हणाले, ‘‘व्यापार वाढवायचा असेल, तर समाजाबद्दल संवेदना दाखवायला हवी. जैन समुदायाने प्रत्येक आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे. सध्या देशात विश्वसनीय नेतृत्व असून प्रत्येक भारतीयात असाधारण कामगिरी करण्याची क्षमता आहे. ते साध्य होण्यासाठी देशात पारदर्शकता हवी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत ही आमची बांधिलकी आहे.’’अबकारी करांचा (एक्साईज) व इतर करांचा उल्लेख करून गोयल म्हणाले, की प्रामाणिक व्यापाऱ्यांना चिंता करण्याची काही गरज नाही. प्रामाणिकता असेल तर भीती कशाची? कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिक व्यापाऱ्यांचा छळ होऊ देणार नाही. कामावर तुम्ही लक्ष ठेवा आणि गैरप्रकार व अपारदर्शकतेशी संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असेही गोयल म्हणाले.जितो चेन्नईकडून महाराष्ट्राला २१ लाखांची मदतजितो चेन्नईकडून मुख्यमंत्री सहायता निधीस २१ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश याप्रसंगी देण्यात आला. जितोतर्फे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त ५00 गावे दत्तक घेण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. दुष्काळ हटविण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी जितोच्या वतीने काम करण्यात येणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने ही जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत.साकला म्हणाले, ‘‘देशभरातून तरुण व विद्यार्थी पुण्यात शिकण्यासाठी येतात. त्यामुळे पुणे ही युवकांची शक्ती आहे. त्यांना प्रेरणा देण्यासाठी जितो कनेक्टचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी आणि त्यातून मोठे उद्योजक घडावेत, ही आमची इच्छा आहे.’’