शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

पाणी देण्याचे भाजपाकडून समर्थन

By admin | Updated: May 4, 2016 04:33 IST

पाण्याचे राजकारण करणारी अभद्र युती, अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील नगरसेवकांकडून संभावना करण्यात आली.

पुणे : पाण्याचे राजकारण करणारी अभद्र युती, अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील नगरसेवकांकडून संभावना करण्यात आली. या तिन्ही पक्षांनी दौंड-इंदापूरला खडकवासला धरणातील पाणी कालव्याने देण्यास विरोध केला असून, असा निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर तीव्र टीका केली आहे. हेच कारण देत भाजपाचा विरोध दुर्लक्षित करून महापालिकेची सर्वसाधारण सभाही तहकूब करण्यात आली.सभा तहकुबीनंतर लगेचच पत्रकारांशी बोलताना भाजपाचे पालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांनी पत्रकारांशी संपर्क साधत तिन्ही पक्षांवर टीका केली. नगरसेवक अशोक येनपुरे, मुक्ता टिळक, मनीषा घाटे या वेळी उपस्थित होते. बिडकर म्हणाले, ‘‘आमची चर्चेची तयारी होती, त्यातून पुणेकरांना पालकमंत्री बापट यांचा निर्णय कसा योग्य आहे, ते समजले असते. पण, त्यांना पाण्याचे राजकारण करायचे होते, त्यामुळे त्यांनी चर्चा होऊ न देता सभा तहकूब केली.’’ या अभद्र युतीतील मनसेच्या राजकारणाची सर्वांना माहिती आहे. पालिकेतील आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकत त्यांनी राष्ट्रवादीला सोयिस्कर भूमिका घेतली आहे, असे सांगत बिडकर यांनी मनसेला धारेवर धरले.पाणी देणे ही आपली संस्कृती आहे. पाऊस सर्वांचाच असतो, त्यामुळे त्याच्या पाण्यावरही सर्वांचाच हक्क आहे, असे स्पष्ट करून बिडकर म्हणाले, ‘‘दौंड-इंदापूरची पाण्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांना पाणी देणे गरजेचे होते. ते देताना पुण्याला कसलीही पाणीकपात होणार नाही. पाण्याच्या एकूण साठ्याचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी पळविले जाणार नाही, शेतीला वापरले जाणार नाही, याची सर्व काळजी घेण्यात आली आहे, मात्र तरीही पाण्याचे राजकारण केले जात आहे.’’ दौंड-इंदापूरला पाणी सोडल्यास खडकवासला धरणात किती पाणी राहणार, ते पुण्याला किती दिवस पुरेल, याबाबत विचारले असता बिडकर आकडेवारी न देता प्रशासनाला सर्व माहिती आहे, असे सांगितले. धरणातील पाण्याचा तळ गाठला गेला आहे, त्यामुळे पुण्याच्या मध्यभागात गढूळ पाणी येण्यास सुरुवात झाली आहे याकडे लक्ष वेधले असता बिडकर यांनी पुण्याच्या एखाद्या भागात असे पाणी आले असेल, पण तो तांत्रिक दोष आहे, असे उत्तर दिले. टँकरने पाणी देणे अव्यवहार्य असल्यामुळेच पाणी कालव्याने देण्याचा निर्णय झाला, असा दावा त्यांनी केला.(प्रतिनिधी)