शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी देण्याचे भाजपाकडून समर्थन

By admin | Updated: May 4, 2016 04:33 IST

पाण्याचे राजकारण करणारी अभद्र युती, अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील नगरसेवकांकडून संभावना करण्यात आली.

पुणे : पाण्याचे राजकारण करणारी अभद्र युती, अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील नगरसेवकांकडून संभावना करण्यात आली. या तिन्ही पक्षांनी दौंड-इंदापूरला खडकवासला धरणातील पाणी कालव्याने देण्यास विरोध केला असून, असा निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर तीव्र टीका केली आहे. हेच कारण देत भाजपाचा विरोध दुर्लक्षित करून महापालिकेची सर्वसाधारण सभाही तहकूब करण्यात आली.सभा तहकुबीनंतर लगेचच पत्रकारांशी बोलताना भाजपाचे पालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांनी पत्रकारांशी संपर्क साधत तिन्ही पक्षांवर टीका केली. नगरसेवक अशोक येनपुरे, मुक्ता टिळक, मनीषा घाटे या वेळी उपस्थित होते. बिडकर म्हणाले, ‘‘आमची चर्चेची तयारी होती, त्यातून पुणेकरांना पालकमंत्री बापट यांचा निर्णय कसा योग्य आहे, ते समजले असते. पण, त्यांना पाण्याचे राजकारण करायचे होते, त्यामुळे त्यांनी चर्चा होऊ न देता सभा तहकूब केली.’’ या अभद्र युतीतील मनसेच्या राजकारणाची सर्वांना माहिती आहे. पालिकेतील आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकत त्यांनी राष्ट्रवादीला सोयिस्कर भूमिका घेतली आहे, असे सांगत बिडकर यांनी मनसेला धारेवर धरले.पाणी देणे ही आपली संस्कृती आहे. पाऊस सर्वांचाच असतो, त्यामुळे त्याच्या पाण्यावरही सर्वांचाच हक्क आहे, असे स्पष्ट करून बिडकर म्हणाले, ‘‘दौंड-इंदापूरची पाण्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांना पाणी देणे गरजेचे होते. ते देताना पुण्याला कसलीही पाणीकपात होणार नाही. पाण्याच्या एकूण साठ्याचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी पळविले जाणार नाही, शेतीला वापरले जाणार नाही, याची सर्व काळजी घेण्यात आली आहे, मात्र तरीही पाण्याचे राजकारण केले जात आहे.’’ दौंड-इंदापूरला पाणी सोडल्यास खडकवासला धरणात किती पाणी राहणार, ते पुण्याला किती दिवस पुरेल, याबाबत विचारले असता बिडकर आकडेवारी न देता प्रशासनाला सर्व माहिती आहे, असे सांगितले. धरणातील पाण्याचा तळ गाठला गेला आहे, त्यामुळे पुण्याच्या मध्यभागात गढूळ पाणी येण्यास सुरुवात झाली आहे याकडे लक्ष वेधले असता बिडकर यांनी पुण्याच्या एखाद्या भागात असे पाणी आले असेल, पण तो तांत्रिक दोष आहे, असे उत्तर दिले. टँकरने पाणी देणे अव्यवहार्य असल्यामुळेच पाणी कालव्याने देण्याचा निर्णय झाला, असा दावा त्यांनी केला.(प्रतिनिधी)