शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आळंदीकरांना दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच, महिन्यापासून गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 03:15 IST

तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पिण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन तब्बल एक महिना पूर्ण झाला आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पातून शहरात नळाद्वारे वितरित होणाºया पाण्याची सध्या ‘रंगपंचमी’ सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना रंगहीन अशुद्ध पाणी प्यावे लागत असून, अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पिण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन तब्बल एक महिना पूर्ण झाला आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पातून शहरात नळाद्वारे वितरित होणाºया पाण्याची सध्या ‘रंगपंचमी’ सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना रंगहीन अशुद्ध पाणी प्यावे लागत असून, अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.आळंदी शहरातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करून १० एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे शुक्रवारी (दि. २९) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते लोकार्पणही करण्यात आले; परंतु लोकार्पण केलेला हा जलशुद्धीकरण प्रकल्प आळंदीकरांना पूर्ण क्षमतेने शुद्ध पाणीपुरवठा वितरित करण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याची सत्यस्थिती समोर येत आहे.एका महिन्यापासून आळंदी शहराला पाणीपुरवठा करणाºया नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे चालू महिन्यात दोन आठवड्यांहून अधिक काळ हा प्रकल्प सुरळीतपणे चालू नव्हता. जलशुद्धीकरण प्रकल्प कधी चालू होतो, तर कधीही बंद पडत आहे. चालू महिन्यात आळंदीकरांना वारंवार त्याचा अनुभव आला आहे. त्यामुळे चालू महिन्यात शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये शनिवारी (दि. ३०) सकाळच्या सत्रात नळाद्वारे चक्क पिवळसर तसेच काळसर घाण पाणी आले होते. अस्वच्छ पाणी आळंदीकरांसाठी नित्याचा प्रश्न बनत चालल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली जाऊ लागली आहे. तर, सोशल मीडियावर अस्वच्छ पाण्यासंदर्भात पालिका प्रशासनावर ताशेरे ओढून संताप व्यक्त केला जात आहे.अद्यापही शुद्ध पाणी नाही...चालू महिन्यात नवीन जलशुद्धीकरण केंद्राची पंपिंग मशीनची यंत्रणा बिघडलेली होती. परिणामी, शहरात अपुरा पाणीपुरवठा होत होता. तर, काही भागात अशुद्ध पाणी वितरित होत होते.मागील आठवड्यात शहरातील प्रभाग ४, २ व ९मधील नळांमधून काळसर रंगाचे पाणी येत होते. त्यानंतर खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद, शाखा अभियंता अजय भोसले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता धनंजय जगधने, मुख्याधिकारी समीर भूमकर आदींनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली होती.प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ उपाययोजना करून शहरात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर दुसºया दिवसापासून जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला होता. परंतु, अजूनही शहराला अपेक्षित आहे तितक्या प्रमाणात पाण्याचे वितरण होत नाही.जलशुद्धीकरण केंद्रात दारूच्या बाटल्यानवीन जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण मंत्रिमहोदयांच्या हस्ते करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, सिद्धबेट येथील जलशुद्धीकरण केंद्राची मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली होती. त्यामुळे परिसरात एरवी असलेली अस्वच्छता गायब झाली. मात्र, जलशुद्धीकरण केंद्राच्या इमारतीत लोकार्पणाच्या दिवशीच दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्याचे आढळून आले. ‘जिथं गावचं पाणी स्वच्छ होतं, त्याच कक्षात दारूच्या बाटल्या कशा?’ असा प्रश्न शहरातील तरुण सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.नवीन जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली होती. शनिवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल.- समीर भूमकर, मुख्याधिकारीआळंदी नगर परिषद

टॅग्स :Waterपाणी