शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

पूरक आराखडा १५ एप्रिलला तयार करणार

By admin | Updated: April 9, 2017 04:29 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाई उपाययोजनांसंदर्भात पूरक आराखडा १५ एप्रिलपर्यंत तयार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दीपक कुलकर्णी यांनी सभागृहाला दिली.

पुणे : जिल्ह्यातील पाणीटंचाई उपाययोजनांसंदर्भात पूरक आराखडा १५ एप्रिलपर्यंत तयार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दीपक कुलकर्णी यांनी सभागृहाला दिली. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते नोव्हेंबर, जानेवारी ते मार्च आणि मार्च ते जून असा तीन टप्प्यांमध्ये २१ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला नुकतीच जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील अनेक टंचाईग्रस्त गावांची नावे नसल्याचे सदस्यांनी पाणीटंचाई आढावा बैठकीमध्ये निदर्शनामध्ये आणून दिले. प्रत्येक तालुक्यामधील १० ते १५ गावे टंचाईग्रस्त आहेत. मात्र, आराखड्यामध्ये फक्त काहीच गावांचा समावेश केला आहे. नागरिकांनी मागणी करूनही टँकर सरू केला जात नाही.भूजल सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने केले जाते. त्यामुळे विंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी दिली जात नाही. शास्त्रीय पद्धतीने भूजल सर्वेक्षण करावे आदी मागण्या करण्यात आल्या. अनेक जिल्हा परिषद सदस्य स्वखर्चाने गावामध्ये टँकर पाठवत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या टंचाई आढावा बैठकीमध्ये सदस्यांनी दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवकाते म्हणाले, की सदस्यांनी तत्काळ आपले प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करावेत. जिल्हाधिकाऱ्यांशी पाणीटंचाईचा आराखड्या- संदर्भात तत्काळ नियोजन करण्याची मागणी केली जाणार आहे.