शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

उन्हाळी लागेल, भरपूर पाणी प्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:10 IST

------------------- उन्हाळा वाढला आणि त्या प्रमाणात पाणी कमी पिण्यात आलं की, बऱ्याच व्यक्तींना , विशेषतः स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याचा ...

-------------------

उन्हाळा वाढला आणि त्या प्रमाणात पाणी कमी पिण्यात आलं की, बऱ्याच व्यक्तींना , विशेषतः स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याचा त्रास होतो. म्हणूनच त्याला उन्हाळी लागणे असे म्हणत असावेत. शाळा, कॉलेज, ऑफिस इत्यादी ठिकाणी सलग ५-६ तास बसावं लागतं. दुपारी निवांत खरेदी करण्यासाठी बाजारात बरंच हिंडले, ऊन लागलं आणि जळती लागली अशी स्त्रियांची तक्रार असते. सार्वजनिक शौचालयाचा वापर केला आणि त्रास सुरू झाला हा एक कॉमन गैरसमज आहे. उलट खूप वेळ लघवी रोखून धरली तर त्रास होऊ शकतो. अनेक व्यक्तींना ही जळजळ दुपारनंतर, संध्याकाळी किंवा रात्री जास्त प्रमाणात सुरू होते, कारण दुपारच्या जेवणानंतर पाणी कमी प्रमाणात प्याले जाते. जळजळ होण्याचा त्रास सुरू झाल्यास भरपूर पाणी प्यावे. लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी प्यायल्याने लघवीची pH अल्कलाईन होते आणि irritation कमी होते. पूर्वी आजी धण्या -जिऱ्याचं पाणी प्यायला द्यायच्या. बाजारात अशी अनेक अल्कलाईन औषधे उपलब्ध आहेत. पण पाण्यासारखे स्वस्त आणि मस्त औषध नाही. काही मंडळी स्वतःच्या मनाने किंवा गूगल सर्च करून अॅंटिबायोटिकच्या दोन चार गोळ्या घेतात आणि त्यांना तात्पुरते बरे वाटते. पण हे अतिशय चुकीचे आहे. लघवी तपासून त्यात जंतुसंसर्ग असल्यास प्रतिजैविके सुरू करावीत. कारण ५० टक्के लोकांना ही जळजळ concentrated Urine मुळे होते आणि त्याला अॅन्टिबायोटिकची गरज नसते. जंतुसंसर्ग असल्यास डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घ्यावीत. संपूर्ण कोर्स झाल्यानंतर देखील वारंवार त्रास झाल्यास युरीन कल्चर, सोनोग्राफी, किडनी फंक्शन टेस्टस् इत्यादी तपासण्या कराव्या लागतात. काही वेळा जंतुसंसर्ग जास्त असल्यास लघवीतून रक्त पडते. अशावेळी ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुतखडा नाही ना हे बघण्याकरिता सोनोग्राफी करणे आवश्यक असते.लघवीची जळजळ होणे हा आजार बहुतांश वेळा किरकोळ समजला जातो.थोडे बरे वाटले की औषधांचा कोर्स पूर्ण केला जात नाही , पण हे फार धोकादायक आहे. कारण हा जंतुसंसर्ग किडनी पर्यंत पोचला तर धोकादायक ठरू शकतो. पायोनेफ्रोसिस आणि किडनी फेल्युअर होऊ शकते. स्त्रियांमध्ये गर्भावस्थेत लघवी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. अंगावर कोणत्याही कारणाने पांढरे जात असेल तरीही जळजळ होऊ शकते. मेनोपॉझ नंतर , गर्भाशय काढल्या नंतर हे त्रास जास्त प्रमाणात जाणवू लागतात.लहान मुलांना कृमी असल्यास हा त्रास होतो. फायमोसिस किंवा युरेटेरिक व्हॉल्व नाहीत ना, हे तपासून बघणे जरूरीचे आहे.पुरुषांना पन्नाशीनंतर प्रोस्टेट ग्रंथी वाढून लघवी तुंबल्याने जंतुसंसर्ग होऊ शकतो.थोडक्यात सांगायचे म्हणजे लघवीला जळजळ अनेक कारणांमुळे होऊ शकते. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. पाणी प्यायला विसरू नका.

- डॅा. माया तुळपुळे, जनरल सर्जन, माजी अध्यक्ष आयएमए