शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी लागेल, भरपूर पाणी प्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:10 IST

------------------- उन्हाळा वाढला आणि त्या प्रमाणात पाणी कमी पिण्यात आलं की, बऱ्याच व्यक्तींना , विशेषतः स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याचा ...

-------------------

उन्हाळा वाढला आणि त्या प्रमाणात पाणी कमी पिण्यात आलं की, बऱ्याच व्यक्तींना , विशेषतः स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याचा त्रास होतो. म्हणूनच त्याला उन्हाळी लागणे असे म्हणत असावेत. शाळा, कॉलेज, ऑफिस इत्यादी ठिकाणी सलग ५-६ तास बसावं लागतं. दुपारी निवांत खरेदी करण्यासाठी बाजारात बरंच हिंडले, ऊन लागलं आणि जळती लागली अशी स्त्रियांची तक्रार असते. सार्वजनिक शौचालयाचा वापर केला आणि त्रास सुरू झाला हा एक कॉमन गैरसमज आहे. उलट खूप वेळ लघवी रोखून धरली तर त्रास होऊ शकतो. अनेक व्यक्तींना ही जळजळ दुपारनंतर, संध्याकाळी किंवा रात्री जास्त प्रमाणात सुरू होते, कारण दुपारच्या जेवणानंतर पाणी कमी प्रमाणात प्याले जाते. जळजळ होण्याचा त्रास सुरू झाल्यास भरपूर पाणी प्यावे. लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी प्यायल्याने लघवीची pH अल्कलाईन होते आणि irritation कमी होते. पूर्वी आजी धण्या -जिऱ्याचं पाणी प्यायला द्यायच्या. बाजारात अशी अनेक अल्कलाईन औषधे उपलब्ध आहेत. पण पाण्यासारखे स्वस्त आणि मस्त औषध नाही. काही मंडळी स्वतःच्या मनाने किंवा गूगल सर्च करून अॅंटिबायोटिकच्या दोन चार गोळ्या घेतात आणि त्यांना तात्पुरते बरे वाटते. पण हे अतिशय चुकीचे आहे. लघवी तपासून त्यात जंतुसंसर्ग असल्यास प्रतिजैविके सुरू करावीत. कारण ५० टक्के लोकांना ही जळजळ concentrated Urine मुळे होते आणि त्याला अॅन्टिबायोटिकची गरज नसते. जंतुसंसर्ग असल्यास डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घ्यावीत. संपूर्ण कोर्स झाल्यानंतर देखील वारंवार त्रास झाल्यास युरीन कल्चर, सोनोग्राफी, किडनी फंक्शन टेस्टस् इत्यादी तपासण्या कराव्या लागतात. काही वेळा जंतुसंसर्ग जास्त असल्यास लघवीतून रक्त पडते. अशावेळी ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुतखडा नाही ना हे बघण्याकरिता सोनोग्राफी करणे आवश्यक असते.लघवीची जळजळ होणे हा आजार बहुतांश वेळा किरकोळ समजला जातो.थोडे बरे वाटले की औषधांचा कोर्स पूर्ण केला जात नाही , पण हे फार धोकादायक आहे. कारण हा जंतुसंसर्ग किडनी पर्यंत पोचला तर धोकादायक ठरू शकतो. पायोनेफ्रोसिस आणि किडनी फेल्युअर होऊ शकते. स्त्रियांमध्ये गर्भावस्थेत लघवी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. अंगावर कोणत्याही कारणाने पांढरे जात असेल तरीही जळजळ होऊ शकते. मेनोपॉझ नंतर , गर्भाशय काढल्या नंतर हे त्रास जास्त प्रमाणात जाणवू लागतात.लहान मुलांना कृमी असल्यास हा त्रास होतो. फायमोसिस किंवा युरेटेरिक व्हॉल्व नाहीत ना, हे तपासून बघणे जरूरीचे आहे.पुरुषांना पन्नाशीनंतर प्रोस्टेट ग्रंथी वाढून लघवी तुंबल्याने जंतुसंसर्ग होऊ शकतो.थोडक्यात सांगायचे म्हणजे लघवीला जळजळ अनेक कारणांमुळे होऊ शकते. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. पाणी प्यायला विसरू नका.

- डॅा. माया तुळपुळे, जनरल सर्जन, माजी अध्यक्ष आयएमए