शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

उन्हाळी बाजरी आली फुलोऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:10 IST

पाऊस चांगला पडल्याने मुबलक पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे भामा आसखेड धरण परिसरातील तसेच भामा नदीकाठासह परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी ...

पाऊस चांगला पडल्याने मुबलक पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे भामा आसखेड धरण परिसरातील तसेच भामा नदीकाठासह परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. उन्हाळ्यात स्वच्छ व दमदार हवामान उपलब्ध होत असल्याने बाजरीचे पीक जोरदार येऊन, उत्पादनही मोठे मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेताना दिसतात.

भामाआसखेड धरणातील पाणी नदीपात्रातून पिण्यासाठी व शेतीसाठी सोडण्यात येते. यामुळे नदीकिनाऱ्यावरील शेतकरी विविध पिके घेत असतात. चाकण, खेड व पुणे येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत आहे. त्याप्रमाणे अनेक शेतकरी आपला तरकारी माल मुंबईलाही पाठवत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

उन्हाळी बाजरी पेरणी केल्यानंतर खुरपणी, खतपाणी व तिची पक्षांपासून निगा राखावी लागत असते. पाणी मुबलक प्रमाणात मिळाल्याने यंदा बाजरीचे पीक जोरदार आले आहे. बाजरीची कणसे मोठी असून, दाणेही टपोरे आहेत. त्यामुळे बाजरीच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी आगाऊ बाजरीची पेरणी केली होती. त्यामुळे या वर्षी बाजरीचे उत्पादन चांगले येणार असल्याचे शिंदे गाव येथील प्रगतशील शेतकरी सुनील देवकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

शिंदे गाव येथील शेतकरी सुनील देवकर यांच्या शेतातील उन्हाळी बाजरीचे जोमदार पीक.