शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
8
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
9
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
10
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
11
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
12
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
13
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
14
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
15
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
16
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
17
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
18
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
19
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
20
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी

जिल्ह्यात १२ लाख ८७ हजार टन उसाचे गाळप

By admin | Updated: November 22, 2014 00:37 IST

अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप आता पूर्वपदावर आले आहे.

सोमेश्वरनगर : अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप आता पूर्वपदावर आले आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी मिळून १२ लाख ८७ हजार ५२ टन उसाचे गाळप करून १२ लाख ४५ हजार ६५५ पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. मात्र, अवकाळी पावसाने व्यत्ययाने थंडीचे प्रमाण नसल्याने साखरउतारा अजून दहा टक्क्यांवरच घुटमळत आहे. जिल्ह्यातील भीमा पाटस व राजगड कारखान्यांची धुराडी अजून बंदच आहेत. या वर्षी साखर कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याअगोदर कारखान्यांपुढे अनेक विघ्ने उभी राहिली होती. ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे कारखाने जोमाने सुरू होण्यासाठी १० नोव्हेंबर उजाडला. चालू महिन्यात अवकाळी पावसामुळे थंडीच गायब झाल्याने कारखान्यांना साखर उतारा मिळत नसल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हा साखर धंद्यातील ‘हाय रिकव्हरी पिरेड’ म्हणून ओळखला जातो. मात्र, अजूनही साखर कारखान्यांचे सरासरी साखरउतारे दहा टक्क्यांवरच घुटमळत आहेत. १५ कारखान्यांपैकी भीमा पाटस, राजगड कारखाने वगळता उर्वरित १३ कारखान्यांमध्ये गाळपाच्या व साखर उत्पादनाच्या बाबतीत सहकारी साखर कारखान्यांच्या पुढे खासगी कारखाने गेले आहेत. बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने १ लाख ९२ हजार ७९० टन उसाचे गाळप करून २ लाख २ हजार ६५० पोत्यांचे उत्पादन घेत पहिल्या स्थानावर आहे. तर १ लाख ६४ हजार १०० टन उसाचे गाळप करून १ लाख ५५ हजार ८०० पोत्यांचे उत्पादन घेत विघ्नहर दुसऱ्या स्थानावर, तर १ लाख ९ हजार ७८० टन उसाचे गाळप करून १ लाख ११ हजार ६०० पोत्यांचे उत्पादन घेत दौंड शुगर तिसऱ्या स्थानावर आहे. सरासरी साखर उताऱ्यातही ११.२ टक्क्यांचा उतारा ठेवत बारामती अ‍ॅग्रोने आघाडी घेतली आहे. (वार्ताहर)