शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

जिल्ह्यात १२ लाख ८७ हजार टन उसाचे गाळप

By admin | Updated: November 22, 2014 00:37 IST

अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप आता पूर्वपदावर आले आहे.

सोमेश्वरनगर : अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप आता पूर्वपदावर आले आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी मिळून १२ लाख ८७ हजार ५२ टन उसाचे गाळप करून १२ लाख ४५ हजार ६५५ पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. मात्र, अवकाळी पावसाने व्यत्ययाने थंडीचे प्रमाण नसल्याने साखरउतारा अजून दहा टक्क्यांवरच घुटमळत आहे. जिल्ह्यातील भीमा पाटस व राजगड कारखान्यांची धुराडी अजून बंदच आहेत. या वर्षी साखर कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याअगोदर कारखान्यांपुढे अनेक विघ्ने उभी राहिली होती. ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे कारखाने जोमाने सुरू होण्यासाठी १० नोव्हेंबर उजाडला. चालू महिन्यात अवकाळी पावसामुळे थंडीच गायब झाल्याने कारखान्यांना साखर उतारा मिळत नसल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हा साखर धंद्यातील ‘हाय रिकव्हरी पिरेड’ म्हणून ओळखला जातो. मात्र, अजूनही साखर कारखान्यांचे सरासरी साखरउतारे दहा टक्क्यांवरच घुटमळत आहेत. १५ कारखान्यांपैकी भीमा पाटस, राजगड कारखाने वगळता उर्वरित १३ कारखान्यांमध्ये गाळपाच्या व साखर उत्पादनाच्या बाबतीत सहकारी साखर कारखान्यांच्या पुढे खासगी कारखाने गेले आहेत. बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने १ लाख ९२ हजार ७९० टन उसाचे गाळप करून २ लाख २ हजार ६५० पोत्यांचे उत्पादन घेत पहिल्या स्थानावर आहे. तर १ लाख ६४ हजार १०० टन उसाचे गाळप करून १ लाख ५५ हजार ८०० पोत्यांचे उत्पादन घेत विघ्नहर दुसऱ्या स्थानावर, तर १ लाख ९ हजार ७८० टन उसाचे गाळप करून १ लाख ११ हजार ६०० पोत्यांचे उत्पादन घेत दौंड शुगर तिसऱ्या स्थानावर आहे. सरासरी साखर उताऱ्यातही ११.२ टक्क्यांचा उतारा ठेवत बारामती अ‍ॅग्रोने आघाडी घेतली आहे. (वार्ताहर)