शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

आलेगाव पागा परिसरातील उसाचे झाले पाचट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:11 IST

शेंडगेवाडी तलावत पाणी होते तोपर्यंत विहिरी, बोअरवेल यांना पाणी होते. तलावात पाणी नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरी, ...

शेंडगेवाडी तलावत पाणी होते तोपर्यंत विहिरी, बोअरवेल यांना पाणी होते. तलावात पाणी नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरी, बोरवेल कोरडेठाण पडलेले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेतात ऊस, तरकारी यांसारखी पिके घेतली आहे. परंतु पाण्याअभावी वर्षभर जगवलेला ऊस पूर्णपणे जळून गेलेला आहे. शेतकऱ्यांना मुबलक पैसे मिळवून देणारे म्हणून ऊस पिकाकडे पाहिले जाते; परंतु पाणी नसल्यामुळे या भागातील शेतकरी शेतातही जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.

चासकमान आवर्तन जाणून-बजून सोडले जात नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला असून, त्यामुळेच तलाव कोरडा पडला आहे. चासकमानचे आवर्तन या तळ्यात आल्याच्यानंतरच या भागातील पिण्याच्या पाण्यासाह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांना भीमा नदीवरून लिप्त स्कीम योजना राबविणे आर्थिकदृष्ट्या खर्चीक आहे. त्यामुळे तलावात पाणी सोडणे हाच उपाय राहतो. तलावात सचारी १९ वरून पाणी सोडल्यास उरळगाव, तांबे वस्ती, कोळपे वस्ती, शेंडगेवाडी, निंबाळकर तलाव या भागातील शेतकरी वर्गांचा फायदा होणार आहे.

या भागातील अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी शेतात कोणतेच पीक घेतले नाही. त्यामुळे जमीन पडीक, मोकळी राहिली आहे. या भागातील तलावात पाणी आल्यास शेतकरी शेतात पीक घेऊ शकतो. पिकासाठी केलेला खर्च हा वाया जाणार आहे. त्यामुळे या भागातील तलावात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.