शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

शिरूर तालुक्यात यंदा पुरेसा पाणीसाठा

By admin | Updated: May 7, 2014 04:25 IST

मे महिना उजाडला असला, तरी सुदैवाने शिरुर तालुक्यात अद्याप पाणी टँकरचा एकही प्रस्ताव नसल्याचे चित्र आहे.

शिरूर : मे महिना उजाडला असला, तरी सुदैवाने तालुक्यात अद्याप पाणी टँकरचा एकही प्रस्ताव नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षात मात्र ११ गावे १४८ वाड्यांना २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. तालुका तसा २००५पासून बर्‍यापैकी टँकरमुक्त झाला आहे. मात्र, २०१२मधील कमी पर्जन्यमानामुळे २०१३मध्ये पाण्याची टंचाई भासली आणि पर्यायाने ११ गावे १४८ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. २०१३मध्ये मात्र सरासरी पाऊस झाल्याने पाण्याची टंचाई दूर झाली. धरणे भरल्याने धरणांचे पाणीही मिळाले. याचा परिणाम होऊन या वर्षी मे महिना उजाडला, तरी टँकरचा प्रस्ताव नसल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले. तालुक्याची दुष्काळी ओळख २००५मध्ये पुसली गेली. कारण चासकमान, डिंभे प्रकल्पाचे पाणी तालुक्याला मिळाले. त्याआधी अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून गणल्या जाणार्‍या या तालुक्याला पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. २००२ ते २००४चा दुष्काळ हा १९७२पेक्षा भयाण होता, असे दुष्काळ भोगलेली माणसे सांगतात. सुदैवाने २००४, २००५मध्ये चांगला पाऊस झाला. प्रकल्पांचे पाणी मिळाले. तालुका दुष्काळमुक्त झाला. धरणांत पाणी कमी असले व पाऊसही अत्यल्प झाल्यास दुष्काळाला सामोरे जावे लागते. प्रकल्पांचा लाभ मिळत नसणार्‍या पश्चिम भागातील काही गावे मात्र आजही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. मागील वर्षी धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. मात्र, आवर्तने मिळालेली गावे वगळता तालुक्यातील ११ गावे १४८ वस्त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. सुदैवाने या वर्षी मे उजाडला, तरी या भागातील एकही प्रस्ताव (टँकरसाठी) नाही. केवळ वाडापुनर्वसन येथील विहीर अधिग्रहणसंदर्भातला प्रस्ताव झाला आहे.