शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

राजीव सातव यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती शुक्रवारी (दि. १४) रात्री अचानक बिघडली. डॉक्टरांनी त्वरित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती शुक्रवारी (दि. १४) रात्री अचानक बिघडली. डॉक्टरांनी त्वरित औषधोपचार सुरू केल्यानंतर शनिवारी (दि. १५) दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.

कोरोनाबाधित झाल्याने सातव जहांगीर रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ते नुकतेच कोरोनामुक्तही झाले. ते औषधांंना योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितले होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रुग्णालयाशी संपर्क ठेवून असल्याची माहिती मिळाली.

त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात होते. असे असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्बेत बिघडली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंनी शुक्रवारीच रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली होती. रात्री तब्येत बिघडल्याचे समजल्यावर त्यांनी पुण्यातच मुक्काम केला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शनिवारी रुग्णालयात जाऊन सातव यांच्या तब्येतीची माहिती घेतली.

“सातव यांची प्रकृती स्थिर आहे. ते औषधांना प्रतिसाद देत आहेत. ते लवकर बरे होतील,” असा विश्वास ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. सातव यांच्या आई रजनी सातव शनिवारी सकाळीच हिंगोलीहून पुण्यात आल्या आहेत. सातव यांचे हिंगोली, पुण्यातील बरेच निकटचे कार्यकर्तेही रुग्णालयात दिसत आहेत. सर्वांचे चेहरे काळजीग्रस्त असून परमेश्वराने सातव यांना लवकर बरे करावे अशी प्रार्थना ते करत आहेत.

चौकट

काय आहे नवा विषाणू?

आणखी एका विषाणूने सातव यांना गाठले?

सातव यांना सायटोमेगँलोव्हायरस या नव्या विषाणूची लागण झाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. या विषाणूबाबत विचारले असता राज्याचे माजी आरोग्य संचालक व कोरोनाकृती दलाचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले, “हा नवा नाही तर जुनाच विषाणू आहे. तोही संसर्गजन्य आहे. प्रौढांपेक्षा लहान मुलांसाठी तो धोकादायक आहे. यावरची परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत. त्याच्या संसर्गातून माणूस बरा होतो.” कोरोनामुळे सातव यांच्या फुप्फुसाची क्षमता आधीच कमी झाल्याने सातव यांना या विषाणूची लागण झाली असावी असा अंदाज डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केला. याला ‘को-इन्फेक्शन’ म्हणतात. कोरोना आणि या विषाणूचा परस्पर संबंध नाही. कोरोना झाला की याचाही संसर्ग होतो असेही नाही, असे डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले.