शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन वर्ग चुकविणाऱ्या विद्यार्थ्यांना अशी शिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:08 IST

पुणे : राज्यातील पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, एकही दिवस प्रत्यक्ष ...

पुणे : राज्यातील पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, एकही दिवस प्रत्यक्ष शाळेत आले नाहीत, ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहिले नाहीत आणि कोणतीही परीक्षा दिली नाहीत, त्या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरच्या वर्गात त्यांना ढकलले जाईल आणि गुणपत्रिकांवर केवळ ‘वर्गोन्नती’ असा शेरा असेल. परंतु, संपूर्ण गुणपित्रका कोरी असणार आहे. यामुळे राज्यातील सर्व शाळांचा निकाल यंदा शंभर टक्के लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना ‘वर्गोन्नती’ देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी कोणत्या मूल्यांकन पद्धतीचा वापर करावा, याबाबतची स्पष्ट माहिती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली. परंतु, सर्व शाळांत एकसारख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना शिक्षकांना अडचणी येत आहेत. परंतु, उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित शाळेच्या परीक्षा समितीने निकाल जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

-------------------

निकाल तयार करण्याबाबत शासनाने सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे काही शाळांनी वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापन केले असले तरी निकाल जाहीर करता येऊ शकतो. परंतु, काही विद्यार्थी एकही दिवस ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने शाळांच्या वर्गांना उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांनी कोणतीही परीक्षा दिली नाही, अशा विद्यार्थ्यांचासुद्धा यंदा उत्तीर्ण केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका पूर्णपणे कोऱ्या असतील. त्यावर फक्त वर्गोन्नतीचा शेरा दिलेला असेल.

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महासंघ

-------

निकालाची तारीख निश्चित

दरवर्षी सर्वसाधारणपणे १ मे रोजी निकाल जाहीर केला जातो. मागील वर्षी कोरोनामुळे शासनाने १० मे रोजी निकाल तयार करून वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अद्याप निकाल जाहीर करण्याची तारीख शासनाने दिलेली नाही. त्यामुळे निकाल केव्हा लागणार याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.