शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ऑनलाईन वर्ग चुकविणाऱ्या विद्यार्थ्यांना अशी शिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:08 IST

पुणे : राज्यातील पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, एकही दिवस प्रत्यक्ष ...

पुणे : राज्यातील पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, एकही दिवस प्रत्यक्ष शाळेत आले नाहीत, ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहिले नाहीत आणि कोणतीही परीक्षा दिली नाहीत, त्या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरच्या वर्गात त्यांना ढकलले जाईल आणि गुणपत्रिकांवर केवळ ‘वर्गोन्नती’ असा शेरा असेल. परंतु, संपूर्ण गुणपित्रका कोरी असणार आहे. यामुळे राज्यातील सर्व शाळांचा निकाल यंदा शंभर टक्के लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना ‘वर्गोन्नती’ देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी कोणत्या मूल्यांकन पद्धतीचा वापर करावा, याबाबतची स्पष्ट माहिती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली. परंतु, सर्व शाळांत एकसारख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना शिक्षकांना अडचणी येत आहेत. परंतु, उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित शाळेच्या परीक्षा समितीने निकाल जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

-------------------

निकाल तयार करण्याबाबत शासनाने सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे काही शाळांनी वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापन केले असले तरी निकाल जाहीर करता येऊ शकतो. परंतु, काही विद्यार्थी एकही दिवस ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने शाळांच्या वर्गांना उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांनी कोणतीही परीक्षा दिली नाही, अशा विद्यार्थ्यांचासुद्धा यंदा उत्तीर्ण केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका पूर्णपणे कोऱ्या असतील. त्यावर फक्त वर्गोन्नतीचा शेरा दिलेला असेल.

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महासंघ

-------

निकालाची तारीख निश्चित

दरवर्षी सर्वसाधारणपणे १ मे रोजी निकाल जाहीर केला जातो. मागील वर्षी कोरोनामुळे शासनाने १० मे रोजी निकाल तयार करून वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अद्याप निकाल जाहीर करण्याची तारीख शासनाने दिलेली नाही. त्यामुळे निकाल केव्हा लागणार याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.