शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

ऑनलाईन वर्ग चुकविणाऱ्या विद्यार्थ्यांना अशी शिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:08 IST

पुणे : राज्यातील पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, एकही दिवस प्रत्यक्ष ...

पुणे : राज्यातील पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, एकही दिवस प्रत्यक्ष शाळेत आले नाहीत, ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहिले नाहीत आणि कोणतीही परीक्षा दिली नाहीत, त्या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरच्या वर्गात त्यांना ढकलले जाईल आणि गुणपत्रिकांवर केवळ ‘वर्गोन्नती’ असा शेरा असेल. परंतु, संपूर्ण गुणपित्रका कोरी असणार आहे. यामुळे राज्यातील सर्व शाळांचा निकाल यंदा शंभर टक्के लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना ‘वर्गोन्नती’ देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी कोणत्या मूल्यांकन पद्धतीचा वापर करावा, याबाबतची स्पष्ट माहिती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली. परंतु, सर्व शाळांत एकसारख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना शिक्षकांना अडचणी येत आहेत. परंतु, उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित शाळेच्या परीक्षा समितीने निकाल जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

-------------------

निकाल तयार करण्याबाबत शासनाने सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे काही शाळांनी वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापन केले असले तरी निकाल जाहीर करता येऊ शकतो. परंतु, काही विद्यार्थी एकही दिवस ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने शाळांच्या वर्गांना उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांनी कोणतीही परीक्षा दिली नाही, अशा विद्यार्थ्यांचासुद्धा यंदा उत्तीर्ण केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका पूर्णपणे कोऱ्या असतील. त्यावर फक्त वर्गोन्नतीचा शेरा दिलेला असेल.

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महासंघ

-------

निकालाची तारीख निश्चित

दरवर्षी सर्वसाधारणपणे १ मे रोजी निकाल जाहीर केला जातो. मागील वर्षी कोरोनामुळे शासनाने १० मे रोजी निकाल तयार करून वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अद्याप निकाल जाहीर करण्याची तारीख शासनाने दिलेली नाही. त्यामुळे निकाल केव्हा लागणार याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.