शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुळशीत हळद उत्पादनाचा पॅटर्न यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:15 IST

तुकाराम मरे यांनी नोकरीच्या नादी न लागता स्वतःची शेती करायचे ठरवूनच मुळशीत भात पीक, इंद्रायणी जातीच्या वाणाचे चारसूत्री पद्धतीने ...

तुकाराम मरे यांनी नोकरीच्या नादी न लागता स्वतःची शेती करायचे ठरवूनच मुळशीत भात पीक, इंद्रायणी जातीच्या वाणाचे चारसूत्री पद्धतीने उत्तम पीक काढले. त्यापाठोपाठ भात कापणीनंतर पारंपरिक हरभरा, काळा गावरान वाटाणा, नाचणीसारखी पिके घेतली. खतासाठी व आर्थिक उत्पादनासाठी गायी पाळून दूध पाळले त्यातून संसाराच्या गरजा भागायला लागल्या. मात्र त्यातून काही वेगळा प्रयोग केल्याचे समाधान मिळत नव्हते. काही तरी वेगळा प्रयोग शेतीत करण्याचा त्यांचा मानस होताच. त्याचवेळी ते सातारा येथील मित्राच्या घरी गेल्यावर तेथील हळद पीक पाहिले व ते पीक मुळशीत घ्यावे या प्रेरणेने सुरुवातीला १० किलो हळद लागवड करून उत्पादन सुरू केले. त्यामध्ये यश आल्यावर पुढे पाचपैकी अडीच एकरावर हळद लागवड केली. त्यास शेणखत देऊन सेंद्रिय हळद पीक घेऊन त्या उत्पादीत हळदिस प्रक्रिया करून सेंद्रिय हळद पावडर तयार केली. त्याची विक्री घरीच सुरू केली. लवासा या पर्यटन क्षेत्रावर येणाऱ्या शहरी नागरिकांना बाजारभावापेक्षा कमी भावाने हळद विक्री केली. हळदीबरोबर घरचे तांदूळ, नाचणी, वाटाणा, हरभरा याची पॅकिंग करून विक्री केली. त्यातून स्वतः बाजारपेठ उपलब्ध करून घेतली.

--------------------

महिला सबलीकरणाचे काम

या कामासाठी परिसरातील महिला भगिनी एकत्र करून शेतकरी महिला कंपनी सुरू केली. परिसरातील शेतमाल त्या कंपनीमार्फत गावातच विकून महिला सबलीकरणाचे काम तुकाराम मरे यांनी केले. त्यास पंचायत समिती कृषी खाते व महाराष्ट्र शासन कृषी खाते मुळशी यांचे मार्गदर्शन मिळाले. एवढ्यावर न थांबता त्यांनी जिल्ह्याबाहेर जळगाव, नाशिक, कोकण येथे जाऊन केळी व आंबा व फळबागाचा अभ्यास केला.

--