शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीचे यश अंधारात

By admin | Updated: October 13, 2014 23:54 IST

सन 2क्14 मध्ये करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची गणना करण्याकडे महापालिकेचा उद्यान विभाग, तसेच लगतच्या मावळमधील प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष केले

पिंपरी : सन 2क्14 मध्ये करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची गणना करण्याकडे महापालिकेचा उद्यान विभाग, तसेच लगतच्या मावळमधील प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे उघड झाले आहे. राज्य शासनाने निर्धारित केलेली सप्टेंबर महिन्याची मुदत संपूनही अद्याप हा कार्यक्रम हातीच घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशाला या वर्षी केराची टोपली दाखविली गेली असून, वृक्षलागवड किती यशस्वी झाली याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 
शासनाने राज्यात गेल्या 3 वर्षात वृक्षलागवड कार्यक्रम राबविला. बहुधा वृक्षलागवड केल्यावर रोपे दगावण्याचे प्रमाण, तसेच एकाच खड्डय़ात दुबार वृक्षलागवड करून आकडे फुगवून दाखविले जाण्याचे गैरप्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले होते. पैसा खर्ची पडूनही ख:या अर्थाने उद्देश सफल होत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले होते. त्यामुळे ठरलेला 3 वर्षाचा कार्यक्रम पार पडल्यावरही केवळ हिरवाई वाढावी यासाठी वृक्षलागवड कार्यक्रम नव्याने सुरू ठेवण्यात आला. त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत वनविभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. मात्र या वेळी खरोखरीच वृक्षलागवड होत आहे का, किती व कोणकोणत्या प्रकारची वृक्षरोपे लावली, त्यांपैकी किती जगली, किती होरपळून गेली याचे निरीक्षणो नोंदविण्याचे ठरले. मागील लागवडीपैकी रोपे मेलेल्या खड्डय़ांतच पुन्हा रोपे लावून खर्च लाटला, तर जात नाही ना, यावर करडी नजर ठेवण्यासाठी या वर्षी 15 ते 3क् सप्टेंबर या कालावधीत वृक्षलागवड गणना व परीक्षण करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी विद्यार्थी, वृक्षप्राधिकरण, पर्यावरण समिती यांच्यावर जबाबदारी सोपवून मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. 
मावळ, मुळशी तालुक्यातील प्रशासनानेही याकडे लक्ष दिले नसल्याने चांगल्या उपक्रमाचे तीन तेरा वाजले असून, ही मोहीम केवळ कागदावरच आहे. एकाच खड्डय़ात दुबार वृक्षलागवडीच्या प्रकारांमुळे प्रशासनाकडून स्थानिक पातळीवरील कार्यक्रमाची होणारी परीक्षाच रद्द झाल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
 
4मुदत संपून गेली, तरीही महापालिकेकडून कोणत्याच प्रकारे मोहीम राबविली नसल्याचे दिसते. आचारसंहिता व निवडणुकीची कारणो देत अधिकारी या विषयावर अधिक बोलणो टाळत आहेत. वास्तविक निवडणुकीत प्रत्येक विभागातील सर्वच कर्मचारी, अधिकारी गुंतलेले नसतात. निवडणुकीनंतर शाळांना 18 पासून दिवाळीच्या सुटी सुरूझाल्यावर मोहीम कशी राबविणार, असा प्रश्न आहे.