शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मोलमजुरी करून मुलाला बनविले उपजिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 02:52 IST

घरची परिस्थिती बेताची. दोन मुली आणि एक मुलगा... त्यांना शिकवण्यासाठी हाताला मिळेल ते काम केले, मोलमजुरी केली, पोटाला चिमटे काढले, पण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही.

पुणे : घरची परिस्थिती बेताची. दोन मुली आणि एक मुलगा... त्यांना शिकवण्यासाठी हाताला मिळेल ते काम केले, मोलमजुरी केली, पोटाला चिमटे काढले, पण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही. शिकण्यासाठी नेहमी पाठबळ दिल्यानेच माझा मुलगा रवींद्र उपजिल्हाधिकारी बनू शकला. त्यासाठी त्याने मोठी मेहनत घेतली, असे सर्वात तरुण वयात उपजिल्हाधिकारी बनलेल्या रवींद्र राठोडचे वडील शंकर राठोड यांनी सांगितले. शंकर राठोड यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर घरची जबाबदारी पडल्याने आणि स्थिती बेताची असल्याने त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. कुटुंबाकडे अडीच एकर कोरडवाहू शेती असून, पाऊस पडला, तरच धान्य पिकते. अनियमित पावसामुळे अनेकदा शेतातून काहीच मिळत नसे. त्यामुळे शंकर राठोड हे हाताला मिळेल ते काम करीत. या आर्थिक विवंचेनेचे चटके त्यांनी कधी आपल्या मुलांना बसू दिले नाही. ते म्हणाले, ‘घरची आर्थिक स्थिती बरी नव्हती, पण कधी व्यसनाच्या आहारी गेलो नाही. आपले शिक्षण कमी झाले, पण मुलांना चांगले शिक्षण द्यायचे, या उद्देशाने मिळेल ते काम करीत गेलो. कारखान्यांमध्ये रोजंदारीवर कामे केली. ते काम नसताना मोलमजुरी केली. मुलांना नेहमी सांगत आलो की, चांगले शिक्षण घेतले, तरच तुम्ही चांगले व्यक्ती बनाल. यामुळे लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची गोडी लागली. मुलाला व दोन्ही मुलींना शिक्षणासाठी शहरांमध्ये पाठविले. अजूनही त्यांना शिकण्यासाठी मी मदत करतो. आज रवींद्र उपजिल्हाधिकारी झाला, यामुळे कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळाले.’ (प्रतिनिधी)