शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

विद्यार्थ्यांची हजेरी नियमितपणे तपासणार

By admin | Updated: May 7, 2017 03:30 IST

खासगी क्लासेसशी करार करून विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थितीत सवलत दिली जात असल्याच्या प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : खासगी क्लासेसशी करार करून विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थितीत सवलत दिली जात असल्याच्या प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नियमितपणे तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करून हजेरीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत यांनी दिली.जेईई किंवा इतर प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. या परीक्षा तसेच अकरावी व बारावीची संपूर्ण तयारी या क्लासेसमध्ये करून घेतली जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वर्गात बसण्यासाठी सवलत मिळावी, यादृष्टीने काही खासगी क्लासेसने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील काही महाविद्यालयांशी करार केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना केवळ दोन दिवस महाविद्यालयात यावे लागणार आहे. इतर दिवशी उपस्थिती नसली तरीही चालणार आहे. त्याबदल्यात विद्यार्थ्यांकडून महाविद्यालये हजारो रुपये घेत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे. याबाबतचे ‘शिक्षण विभागाला ठेंगा दाखवत गैरहजेरीसाठी सशुल्क सवलत’ हे वृत्त शनिवारी प्रसिद्ध झाले आहे. या प्रकाराची दखल शिक्षण विभागानेही घेतली आहे.याविषयी बोलताना राऊत म्हणाल्या, ‘‘येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. त्यासाठी स्वतंत्र पथके करून महाविद्यालयांना भेटी दिल्या जातील. महाविद्यालयांमध्ये अचानक जाऊन तपासणी केली जाईल. या तपासणीमध्ये सातत्य राखले जाईल. नियमानुसार वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती असलीच पाहिजे. तसेच ज्या महाविद्यालयांना बायोमेट्रिक हजेरीसाठी यंत्रणा बसविणे शक्य आहे, त्यांनी अशी यंत्रणा बसविणे अपेक्षित आहे. त्याचीही माहिती घेतली जाणार आहे.अनुपस्थिती आढळून आल्यास तक्रार करा...वर्गामध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आढळून  आल्यास किंवा एखाद्या महाविद्यालयामध्ये  अकरावी-बारावीचे वर्ग भरत नसल्यास त्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे कुणालाही तक्रार करता येईल.  राज्य शासनाने प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तक्रार पेटी बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या तक्रार पेटीतही याबाबतची तक्रार टाकता येईल, असे आवाहन सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत यांनी केले. प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन संबंंधित महाविद्यालयाची अचानक तपासणी केली जाईल. या तपासणीत विद्यार्थ्यांची सातत्याने अनुपस्थिती आढळून आल्यास संबंधित महाविद्यालयावर कारवाई केली जाईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.