शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

विद्यार्थ्यांची हजेरी नियमितपणे तपासणार

By admin | Updated: May 7, 2017 03:30 IST

खासगी क्लासेसशी करार करून विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थितीत सवलत दिली जात असल्याच्या प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : खासगी क्लासेसशी करार करून विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थितीत सवलत दिली जात असल्याच्या प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नियमितपणे तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करून हजेरीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत यांनी दिली.जेईई किंवा इतर प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. या परीक्षा तसेच अकरावी व बारावीची संपूर्ण तयारी या क्लासेसमध्ये करून घेतली जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वर्गात बसण्यासाठी सवलत मिळावी, यादृष्टीने काही खासगी क्लासेसने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील काही महाविद्यालयांशी करार केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना केवळ दोन दिवस महाविद्यालयात यावे लागणार आहे. इतर दिवशी उपस्थिती नसली तरीही चालणार आहे. त्याबदल्यात विद्यार्थ्यांकडून महाविद्यालये हजारो रुपये घेत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे. याबाबतचे ‘शिक्षण विभागाला ठेंगा दाखवत गैरहजेरीसाठी सशुल्क सवलत’ हे वृत्त शनिवारी प्रसिद्ध झाले आहे. या प्रकाराची दखल शिक्षण विभागानेही घेतली आहे.याविषयी बोलताना राऊत म्हणाल्या, ‘‘येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. त्यासाठी स्वतंत्र पथके करून महाविद्यालयांना भेटी दिल्या जातील. महाविद्यालयांमध्ये अचानक जाऊन तपासणी केली जाईल. या तपासणीमध्ये सातत्य राखले जाईल. नियमानुसार वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती असलीच पाहिजे. तसेच ज्या महाविद्यालयांना बायोमेट्रिक हजेरीसाठी यंत्रणा बसविणे शक्य आहे, त्यांनी अशी यंत्रणा बसविणे अपेक्षित आहे. त्याचीही माहिती घेतली जाणार आहे.अनुपस्थिती आढळून आल्यास तक्रार करा...वर्गामध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आढळून  आल्यास किंवा एखाद्या महाविद्यालयामध्ये  अकरावी-बारावीचे वर्ग भरत नसल्यास त्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे कुणालाही तक्रार करता येईल.  राज्य शासनाने प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तक्रार पेटी बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या तक्रार पेटीतही याबाबतची तक्रार टाकता येईल, असे आवाहन सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत यांनी केले. प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन संबंंधित महाविद्यालयाची अचानक तपासणी केली जाईल. या तपासणीत विद्यार्थ्यांची सातत्याने अनुपस्थिती आढळून आल्यास संबंधित महाविद्यालयावर कारवाई केली जाईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.