शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची हजेरी नियमितपणे तपासणार

By admin | Updated: May 7, 2017 03:30 IST

खासगी क्लासेसशी करार करून विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थितीत सवलत दिली जात असल्याच्या प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : खासगी क्लासेसशी करार करून विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थितीत सवलत दिली जात असल्याच्या प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नियमितपणे तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करून हजेरीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत यांनी दिली.जेईई किंवा इतर प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. या परीक्षा तसेच अकरावी व बारावीची संपूर्ण तयारी या क्लासेसमध्ये करून घेतली जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वर्गात बसण्यासाठी सवलत मिळावी, यादृष्टीने काही खासगी क्लासेसने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील काही महाविद्यालयांशी करार केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना केवळ दोन दिवस महाविद्यालयात यावे लागणार आहे. इतर दिवशी उपस्थिती नसली तरीही चालणार आहे. त्याबदल्यात विद्यार्थ्यांकडून महाविद्यालये हजारो रुपये घेत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे. याबाबतचे ‘शिक्षण विभागाला ठेंगा दाखवत गैरहजेरीसाठी सशुल्क सवलत’ हे वृत्त शनिवारी प्रसिद्ध झाले आहे. या प्रकाराची दखल शिक्षण विभागानेही घेतली आहे.याविषयी बोलताना राऊत म्हणाल्या, ‘‘येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. त्यासाठी स्वतंत्र पथके करून महाविद्यालयांना भेटी दिल्या जातील. महाविद्यालयांमध्ये अचानक जाऊन तपासणी केली जाईल. या तपासणीमध्ये सातत्य राखले जाईल. नियमानुसार वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती असलीच पाहिजे. तसेच ज्या महाविद्यालयांना बायोमेट्रिक हजेरीसाठी यंत्रणा बसविणे शक्य आहे, त्यांनी अशी यंत्रणा बसविणे अपेक्षित आहे. त्याचीही माहिती घेतली जाणार आहे.अनुपस्थिती आढळून आल्यास तक्रार करा...वर्गामध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आढळून  आल्यास किंवा एखाद्या महाविद्यालयामध्ये  अकरावी-बारावीचे वर्ग भरत नसल्यास त्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे कुणालाही तक्रार करता येईल.  राज्य शासनाने प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तक्रार पेटी बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या तक्रार पेटीतही याबाबतची तक्रार टाकता येईल, असे आवाहन सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत यांनी केले. प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन संबंंधित महाविद्यालयाची अचानक तपासणी केली जाईल. या तपासणीत विद्यार्थ्यांची सातत्याने अनुपस्थिती आढळून आल्यास संबंधित महाविद्यालयावर कारवाई केली जाईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.