शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:09 IST

पुणे : शाळा सुरू झाल्यानंतर १५ दिवसांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या पुरवठ्याचा मोहिमेचा शालेय ...

पुणे : शाळा सुरू झाल्यानंतर १५ दिवसांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या पुरवठ्याचा मोहिमेचा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते गुरुवारी बालभारती येथे शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे उशिरा का होईना, पण विद्यार्थ्यांना कोरोना काळात अभ्यास करण्यासाठी पुस्तके मिळणार आहेत.

पाठ्यपुस्तक पुरवठा मोहीम शुभारंभ कार्यक्रमास बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी आदी उपस्थित होते.

शासनाच्यावतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. यावर्षी पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी आवश्यक असणाऱ्या कागदासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे पुस्तक छपाईस विलंब झाला. न्यायालयीन प्रकरण निकालात निघाल्यानंतर आता पुस्तक छपाई व पुरवठा सुरळीत सुरू झाला. प्रथम टप्प्यात राज्याच्या दुर्गम भागात पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. उर्वरित ठिकाणी देखील लवकरच पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

-------

पीडीएफ फाइल उपलब्ध

पाठ्यपुस्तक मंडळाने पहिली ते बारावीच्या सर्व पुस्तकांच्या पीडीएफ फाईल बालभारतीच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. आतापर्यंत सुमारे १ कोटी ७८ लाख पुस्तके विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केली आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.

----------------

शिक्षणमंत्र्यांचा अचानक दौरा

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बालभारती येथे अचानक पाठ्यपुस्तक पुरवठा शुभारंभाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे शिक्षण अधिकारीही चक्रावून गेले. गेल्या काही दिवसांपासून शिक्षण क्षेत्राशी निगडित असणारे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यात दहावी-बारावी परीक्षेचा निकाल, शाळांकडून मनमानी पद्धतीने आकारले जाणारे शुल्क, आरटीई प्रवेशावर संस्थाचालकांनी घातलेला बहिष्कार आदी प्रश्नांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे टाळण्यासाठीच वर्षा गायकवाड यांनी अचानक कोणतीही कल्पना न देता येथील कार्यक्रमास हजेरी लावली का? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे.