शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

संशोधन करून विद्यार्थ्यांनी देशासाठी योगदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:15 IST

पुणे : देशाने मला काय दिले याचा विचार न करता मी समाजाला काय दिले, या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांनी विचार ...

पुणे : देशाने मला काय दिले याचा विचार न करता मी समाजाला काय दिले, या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांनी विचार करात नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून देशासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११८ व्या पदवीप्रदान समारंभात कोश्यारी बोलत होते. या कार्यक्रमास लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ऑनलाइन पद्धतीने तर विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात पार पडलेल्या या समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, आंतर-विद्याशाखीय अभ्यास शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे आदी उपस्थित होते. यावेळी १ लाख ६१ हजार ५९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे देणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

कोरोनादरम्यान ऑनलाईन परीक्षा हे खूप मोठे आव्हान होते. मात्र, हे आव्हान ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्वीकारले व यशस्वी करून दाखवले त्याप्रमाणे तुम्हीदेखील बदलता काळ स्वीकारत पुढे चलावे, असा संदेश यावेळी कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना दिला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात आलेले उपक्रम व योजनांचा आढावा सर्वांपुढे मांडला. तसेच पुढील १० वर्षांच्या वाटचालीची पायाभरणी चार वर्षांत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

--------

सुमित्रा महाजन म्हणाल्या, शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण नोकरीत पॅकेजचा विचार करतो. परंतु, त्याबरोबर आपण समाजाचे देणे लागतो, याचाही विचार असावा. प्रत्येकाने समाजाप्रतीची संवेदनशीलता कायम जपली पाहिजे.

----------------

उदय सामंत म्हणाले, विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. तसेच नवे शैक्षणिक धोरण आत्मसात करण्यातही विद्यापीठ पुढे आहे. कोरोना काळात ‘एनएसएस’ च्या विद्यार्थ्यांनी खूप मोठे समाजकार्य केले याचे मला कौतुक आहे.

---------

फोटो

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या समारंभात वेदांत मुंदडा या विद्यार्थ्याला ‘द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले. सन २०१९-२० चा ‘बेस्ट स्टुडंट’चा मानही वेदांतने पटकावला.