शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’साठी विद्यार्थ्यांच्या उड्या

By admin | Updated: June 24, 2017 06:10 IST

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तुलनेत राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडू लागल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तुलनेत राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडू लागल्या आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत आॅनलाईन नोंदणी सुरू झाल्यानंतर सहा दिवसांतच तब्बल १ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी नोंदणी केली आहे. अभियांत्रिकीसाठी केवळ १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.मागील काही वर्षांपासून अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहतात. तुलनेने ‘आयटीआय’कडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. यंदा राज्यात आयटीआय प्रवेशासाठी शासकीय व खासगी संस्थांमधील प्रवेशक्षमता एकूण १ लाख ३३ हजार एवढी आहे. केंद्रीय पद्धतीने आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया १९ जूनपासून सुरू झाली असून, २ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. मागील सहा दिवसांत १ लाख ६३ हजार ७९१ विद्यार्थ्यांनी अर्जासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ५ हजार १०६ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरला असून, २४ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केला आहे. तर ८ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी पसंती क्रम अर्जही भरला असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी अद्यापही नऊ दिवसांची मुदत आहे. या तुलनेत अभियांत्रिकीचा विचार केल्यास राज्यात यंदा सुमारे १ लाख ४० हजार जागा उपलब्ध असून त्यासाठी सुमारे १ लाख २० हजार अर्ज आले आहेत. याचा अर्थ यंदाही अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयटीआयला अर्ज करणारे काही विद्यार्थी अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.