शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

‘आयटीआय’साठी विद्यार्थ्यांच्या उड्या

By admin | Updated: June 24, 2017 06:10 IST

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तुलनेत राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडू लागल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तुलनेत राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडू लागल्या आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत आॅनलाईन नोंदणी सुरू झाल्यानंतर सहा दिवसांतच तब्बल १ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी नोंदणी केली आहे. अभियांत्रिकीसाठी केवळ १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.मागील काही वर्षांपासून अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहतात. तुलनेने ‘आयटीआय’कडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. यंदा राज्यात आयटीआय प्रवेशासाठी शासकीय व खासगी संस्थांमधील प्रवेशक्षमता एकूण १ लाख ३३ हजार एवढी आहे. केंद्रीय पद्धतीने आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया १९ जूनपासून सुरू झाली असून, २ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. मागील सहा दिवसांत १ लाख ६३ हजार ७९१ विद्यार्थ्यांनी अर्जासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ५ हजार १०६ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरला असून, २४ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केला आहे. तर ८ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी पसंती क्रम अर्जही भरला असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी अद्यापही नऊ दिवसांची मुदत आहे. या तुलनेत अभियांत्रिकीचा विचार केल्यास राज्यात यंदा सुमारे १ लाख ४० हजार जागा उपलब्ध असून त्यासाठी सुमारे १ लाख २० हजार अर्ज आले आहेत. याचा अर्थ यंदाही अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयटीआयला अर्ज करणारे काही विद्यार्थी अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.