शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन दिले जावे

By admin | Updated: February 22, 2017 03:16 IST

देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संशोधनाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन

पुणे : देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संशोधनाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच आयआयटीसारख्या संस्थांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना संशोधनासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. संशोधन क्षेत्रात भारत आघाडीवर असल्याचे बोलले जात असले, तरी या क्षेत्रात अधिक काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी व्यक्त केले. अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान सल्लागार क्षेत्रातील केपीआयटी या कंपनीतर्फे ‘केपीआयटी स्पार्कल २०१७’ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी जावडेकर बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि केपीआयटीच्या इनोव्हेटिव्ह समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, नॉसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक, केपीआयटीचे सहसंस्थापक रवी पंडित आदी उपस्थित होते. ‘स्मार्ट सिटी’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित स्पर्धेत मंगलोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंगच्या तसेच शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, बिरला इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बिटस्) पिलानी, भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रिअल टेक्नॉलॉजी या महाविद्यालयांनी पारितोषिक पटकावले. केपीआयटीचे सहसंस्थापक आणि समूह सीईओ रवी पंडित म्हणाले, की देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी स्मार्ट सिटींचा विकास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आपली वाढणारी शहरी अर्थव्यवस्था शाश्वत करण्यासाठी तरुणांना नावीन्यपूर्ण डिझाइन तयार करण्याच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. (प्रतिनिधी)