शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासाला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:09 IST

कोरोनामुळे विद्यार्थी घरातच आहेत. त्यामुळे आई-वडील, कुटुंबातील इतर सदस्य यांच्यातील संवाद आणि कानावर पडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही ...

कोरोनामुळे विद्यार्थी घरातच आहेत. त्यामुळे आई-वडील, कुटुंबातील इतर सदस्य यांच्यातील संवाद आणि कानावर पडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही बदल घडत असतात. सध्या विद्यार्थी घरातच आहेत. त्यामुळे आई-वडिलांचा श्रमविषयक दृष्टिकोण, सांस्कृतिक चालीरीती संबंधीचे त्यांचे धोरण यांबाबत मुलांना काही गोष्टी ज्ञात होत आहेत. परंतु, कोरोनाकाळात कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणामुळे व ताण-तणावामुळे मुलांच्या मनावर परिणाम खोलवर झाला आहेत. त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम झाला आहे.

शालेय व महाविद्यालयीन वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर फार मोठा प्रभाव पडत असतो. शाळेत गेल्यावर विद्यार्थ्यांना मित्र भेटतात. एक नवीन वातावरण अनुभवायला मिळते. शालेय जीवनात शिस्तीचे व नियमितपणाचे धडे मिळतात. लेखन व वाचनाची गोडी निर्माण होते. वक्तशीरपणा व नियमितपणा यांचे महत्त्व समजते.

शालेय विद्यार्थ्यांवर कोणत्या ना कोणत्या शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडत असतो. शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श बनतो. बऱ्याच वेळा शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व व त्यांच्याकडून दिली जाणारी वागणूक या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतात. एखाद्या शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असेल तर शिक्षकाला आदर्श रूप समजून त्याच्यासारखे ज्ञान, बुद्धी व बळ प्राप्त करण्याची इच्छा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते. एकूणच शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे गुणदोष मुलांशी घडणाऱ्या त्यांच्या वागणुकीतून प्रकट होतात. त्या सर्व गुणांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. जिव्हाळ्याने शिकवणारा शिक्षक मुलांच्या मनात जिव्हाळा निर्माण करतो, तर चुकीचे किंवा दुष्ट वर्तन करणारा शिक्षक मुलांच्या मनात दृष्ट वर्तनाचे बीजारोपण करतो, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

शाळेत विद्यार्थ्यांना मिळणारा मित्रपरिवार त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला कारणीभूत ठरत असतो. विद्यार्थी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या बाबतीत स्पर्धा करू लागतात. या स्पर्धेत द्वेष, वैरभाव असण्याची शक्यता असते. मात्र, परिश्रम व चिकाटीही वाढीला लागते. अभ्यासाबरोबरच शाळेत खेळताना मित्रांशी येणारे परस्परसंबंध मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पाडत असतात. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी शालेय वातावरणापासून दूर आहेत. त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या महत्त्व विकासात अडथळा निर्माण झाला आहे.

समाजाचे व्यक्तीवर नियंत्रण असते. रूढी-चालीरीती, परंपरा, सामाजिक नियम आदींचा व्यक्तीच्या जीवनशैलीवर व्यापक प्रभाव पडत असतो. समाजाच्या नियमांचे उल्लंघन करून मनासारखे वागता येत नाही. समाजात राहूनच प्रत्येकाला सामाजिक आदर्शाचा अंगीकार करावा लागतो. समाजात काही लोक प्रस्थापित नियमांना विरोध करणारे असतात, तर काही परंपराप्रिय असतात. व्यक्ती व समाजाच्या या संघर्षामुळे व्यक्तिमत्त्व विकासात अनेक अडचणी निर्माण होतात. परंतु, त्यातून प्रत्येक जण सद्सदविवेकाला अनुसरून या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनच व्यक्तिमत्त्व विकसित होत जाते. त्यामुळे केवळ शालेय विद्यार्थीच नाही तर महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा व्यक्तिमत्त्व विकासाला मुकले आहेत.

शाळेत न गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि संभाषण कौशल्यवरही परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची वाचनाची व लेखनाची गती मंदावली आहे. केवळ व्यक्तिमत्त्वच नाही तर इतर कौशल्यही विद्यार्थ्यांना हव्या त्या प्रमाणात कोरोनामुळे आत्मसात करणे अशक्य झाले नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे पुढील काळात ही उणीव भरून काढण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहे.

- राहुल शिंदे