शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

एसटीचे पुणे जिल्हा आगार कायमच आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एसटी महामंडळाची सुरुवात झाली तेव्हापासून एसटीचे पुणे आगार इतरांच्या तुलनेत कायम आघाडीवर राहिले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एसटी महामंडळाची सुरुवात झाली तेव्हापासून एसटीचे पुणे आगार इतरांच्या तुलनेत कायम आघाडीवर राहिले आहे. राज्यातील महत्त्वाचे ठिकाण असल्याने प्रशासनाकडूनही पुणे आगारातील गाड्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात असते.

पुणे आगाराच्या एकूण ८५० गाड्या आहेत. त्यातील ८६ वातानूकुलित आहेत. ६६ निमआराम आहेत. ५० गाड्या शिवनेरी आहेत. शिवशाही ४० आहेत. उर्वरित गाड्या साध्या आहेत.

या ताफ्यात एकही गाडी १० वर्षांपेक्षा जास्त वयाची नाही. आरटीओकडून अशा गाड्यांमधून प्रवासी वाहतूक करायला मनाई आहे. त्यामुळे या गाड्या ठेवल्याच जात नाहीत. त्यांचा वापर झालाच तर मालवाहतुकीसाठी म्हणून केला जातो.

या सर्व गाड्या जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही धावत असतात. साधारण १० हजार किलोमीटर झाल्यानंतर काही प्रमाणात म्हणजे १०० गाड्यांमागे एका गाडीचा ब्रेकडाऊन मान्य केला जातो. मात्र पुणे आगारात तेही होत नाही. बाहेरून आलेल्या काही गाड्या बंद पडतात, मात्र लगेचच त्यांची दुरूस्ती पुणे आगाराच्या कार्यशाळेत केली जाते व त्या सुरू करून दिल्या जातात. त्यामुळे आगारातून गाडी सुटली व ती मध्येच बंद पडली, प्रवाशांची गैरसोय झाली असे प्रकार नाहीत.

कोरोनाकाळात एसटीच्या सर्वच गाड्या बंद होत्या. त्यानंतर हळूहळू काही मार्ग बरेचसे नियम बंधनकारक करून सुरू झाल्या. आता मात्र सर्व मार्ग व्यवस्थित सुरू आहेत. त्यावर गाड्याही पुरेशा आहे. ८५० पैकी ज्या गाड्या १० वर्षे पूर्ण करतील त्या लगेचच कमी केल्या जातात व तिथे नव्या गाड्या दाखल होतात. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळेच पुणे आगाराची कार्यक्षमता चांगली राहिलेली आहे.

जिल्ह्यात १३ आगार आहेत. राज्यातील सर्व प्रमुख ठिकाणी तिथून गाड्या सुटतात. बाहेरून आलेल्या गाड्यांसह जिल्ह्यातील गाड्यांचीही सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवली जाते. सर्व ठिकाणच्या कार्यशाळा सर्व साधनसामग्रींनी सुसज्ज आहेत.

खर्च काही लाखांत

प्रत्येक गाडीचे काम वेगळे असते, त्यासाठीचा खर्च वेगळा असतो. त्यामुळे दुरुस्तीसाठी म्हणून वार्षिक खर्च निश्चित असा सांगता येणार नाही. हा खर्च काही लाख रुपये असला तरी तो एकूण उत्पन्नाच्या तुलनेत कमी आहे.

-----

उद्दिष्ट लवकरच गाठणार

कोरोनाच्या आधी आमचे ३ लाख किलोमीटर होते. आता टाळेबंदीनंतर आम्ही २ लाख ७० हजार किलोमीटरचे उद्दिष्ट गाठले आहे. मुंबईत लोकल बंद असल्यामुळे आमच्या काही गाड्या तिकडे गेल्या आहेत. त्या परत आल्या की पूर्ण उद्दिष्ट साध्य करू. ब्रेकडाऊन एकही नाही याचे कारण वर्कशॉपकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. तेथील प्रमुखांसह कर्मचाऱ्यांचे काम यामागे आहे.

- रमाकांत गायकवाड, पुणे जिल्हा नियंत्रक