शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

एसटीचे पुणे जिल्हा आगार कायमच आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एसटी महामंडळाची सुरुवात झाली तेव्हापासून एसटीचे पुणे आगार इतरांच्या तुलनेत कायम आघाडीवर राहिले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एसटी महामंडळाची सुरुवात झाली तेव्हापासून एसटीचे पुणे आगार इतरांच्या तुलनेत कायम आघाडीवर राहिले आहे. राज्यातील महत्त्वाचे ठिकाण असल्याने प्रशासनाकडूनही पुणे आगारातील गाड्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात असते.

पुणे आगाराच्या एकूण ८५० गाड्या आहेत. त्यातील ८६ वातानूकुलित आहेत. ६६ निमआराम आहेत. ५० गाड्या शिवनेरी आहेत. शिवशाही ४० आहेत. उर्वरित गाड्या साध्या आहेत.

या ताफ्यात एकही गाडी १० वर्षांपेक्षा जास्त वयाची नाही. आरटीओकडून अशा गाड्यांमधून प्रवासी वाहतूक करायला मनाई आहे. त्यामुळे या गाड्या ठेवल्याच जात नाहीत. त्यांचा वापर झालाच तर मालवाहतुकीसाठी म्हणून केला जातो.

या सर्व गाड्या जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही धावत असतात. साधारण १० हजार किलोमीटर झाल्यानंतर काही प्रमाणात म्हणजे १०० गाड्यांमागे एका गाडीचा ब्रेकडाऊन मान्य केला जातो. मात्र पुणे आगारात तेही होत नाही. बाहेरून आलेल्या काही गाड्या बंद पडतात, मात्र लगेचच त्यांची दुरूस्ती पुणे आगाराच्या कार्यशाळेत केली जाते व त्या सुरू करून दिल्या जातात. त्यामुळे आगारातून गाडी सुटली व ती मध्येच बंद पडली, प्रवाशांची गैरसोय झाली असे प्रकार नाहीत.

कोरोनाकाळात एसटीच्या सर्वच गाड्या बंद होत्या. त्यानंतर हळूहळू काही मार्ग बरेचसे नियम बंधनकारक करून सुरू झाल्या. आता मात्र सर्व मार्ग व्यवस्थित सुरू आहेत. त्यावर गाड्याही पुरेशा आहे. ८५० पैकी ज्या गाड्या १० वर्षे पूर्ण करतील त्या लगेचच कमी केल्या जातात व तिथे नव्या गाड्या दाखल होतात. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळेच पुणे आगाराची कार्यक्षमता चांगली राहिलेली आहे.

जिल्ह्यात १३ आगार आहेत. राज्यातील सर्व प्रमुख ठिकाणी तिथून गाड्या सुटतात. बाहेरून आलेल्या गाड्यांसह जिल्ह्यातील गाड्यांचीही सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवली जाते. सर्व ठिकाणच्या कार्यशाळा सर्व साधनसामग्रींनी सुसज्ज आहेत.

खर्च काही लाखांत

प्रत्येक गाडीचे काम वेगळे असते, त्यासाठीचा खर्च वेगळा असतो. त्यामुळे दुरुस्तीसाठी म्हणून वार्षिक खर्च निश्चित असा सांगता येणार नाही. हा खर्च काही लाख रुपये असला तरी तो एकूण उत्पन्नाच्या तुलनेत कमी आहे.

-----

उद्दिष्ट लवकरच गाठणार

कोरोनाच्या आधी आमचे ३ लाख किलोमीटर होते. आता टाळेबंदीनंतर आम्ही २ लाख ७० हजार किलोमीटरचे उद्दिष्ट गाठले आहे. मुंबईत लोकल बंद असल्यामुळे आमच्या काही गाड्या तिकडे गेल्या आहेत. त्या परत आल्या की पूर्ण उद्दिष्ट साध्य करू. ब्रेकडाऊन एकही नाही याचे कारण वर्कशॉपकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. तेथील प्रमुखांसह कर्मचाऱ्यांचे काम यामागे आहे.

- रमाकांत गायकवाड, पुणे जिल्हा नियंत्रक