शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:09 IST

इंदापूर : तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांची पडझड झाली. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ ...

इंदापूर : तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांची पडझड झाली. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यास प्रयत्नशील असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरातील गोतंडी, शेळगाव, तसेच उजनी बॅकवॉटर पट्ट्यातील गंगावळण, कळाशी या परिसरातील ज्या केळी बागा शेतात उभ्या होत्या. त्या कोसळल्या आहेत तर ऊस, मका डाळिंब तसेच द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले. या सर्व परिसराची पाहणी सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (दि. २८) केली. या वेळी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे, इंदापूर तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी व पंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी संवाद सांगताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.

दत्तात्रय भरणे यांनी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान वादळी वाऱ्याने, पावसाने झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश तसेच या नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे अशाही घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित पाहणी दौऱ्यात दिले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे शेतीपिकांचे जास्त नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकार हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

मागील दोन वर्षांपासून अनेक संकटांशी सामना नागरिकांना व जनतेला करावा लागतो आहे. मात्र बळीराजा आपली शेती पडीक न ठेवता वेगवेगळे प्रयोग शेतात राबवतो. व शेती पिकवतो आणि येणाऱ्या आपत्तीमध्ये त्या शेतकऱ्याचे नुकसान होते. हे नुकसान भरून न येणारे असते, शेतकऱ्यांची अशी अवस्था पहिलीची मनाला वेदना होतात. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील ज्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे, ते ज्या घरांची पडझड झाली आहे त्यांना नक्की शासनाकडून मदत मिळेल, अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे दुचाकीवर

नुकसानग्रस्त शेतीपिकाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दत्तात्रय भरणे अधिकाऱ्यांचा लवाजमा घेऊन दुचाकीवर पोहोचले. शेतीच्या बांधावरच पंचनाम्याचे आदेशही दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धीर मिळाला आहे. मंत्री असतानाही कोणताही ढोल मोल न करता, शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून भरणे यांचा पाहणी दौरा केल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

२८ इंदापूर

इंदापूर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व संबंधित विभागाचे अधिकारी.

===Photopath===

280521\28pun_4_28052021_6.jpg

===Caption===

२८ इंदापूर इंदापूर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व संबंधित विभागाचे अधिकारी.