शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी १०७ गावांत कठोर उपाययोजना लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या ही अद्यापही कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस रुग्णसंख्या ही वाढत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या ही अद्यापही कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस रुग्णसंख्या ही वाढत आहे. त्यात आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेने स्वयंसेवी संस्थांमार्फत केलेल्या सर्वेक्षणात १०७ गावांत कोरोना वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. या गावांत येत्या १५ दिवसांत कोरोना नियंत्रणात आणण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे. घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली असून अहवाल येईपर्यंत घरातच विलीगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सोबतच नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही आयुष प्रसाद यांनी केल्या आहेत.

ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात होती. अनेक गावे ही कोरोनामुक्त झाली होती, तर काहींनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते. मात्र, ही परिस्थिती बदलत असून पुन्हा कोरोना नव्या गावात आपले पाय पसरू लागला आहे. जिल्ह्यातील १०७ गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या गावांत कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले असून शुक्रवारी या गावांच्या सरपंचांशी त्यांनी संवाद साधला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात ती आटोक्यात येत नसल्याने ही बाब चिंताजनक आहे. त्यात १०७ गावांमधून कोरोना अद्यापही हद्दपार झाला नाही. या गावातून कोरोना प्रसाराचा धोका असल्याने या गावांना कोरोनामुक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासन, जिल्हापरिषद प्रशासन आणि पोलिसांतर्फे या गावात उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. तशा सूचना प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच ग्रामसेवकांना दिल्या आहेत.

१०७ गावांतून कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जोपर्यंत चाचणी अहवाल येत नाही तोपर्यंत घरातच विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. लक्षणे असो वा नसो पुढील १५ दिवस कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने घरातही मास्क घालने बंधनकारक राहणार आहे. या सोबतच घरात वावरताना शारीरिक अंतराचे पालन होईल या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: झोपताना काळजी नागरिकांनी घ्यावी. या सोबतच बाथरूम आणि शौचालयाचा वापर झाल्यावर त्याचे निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचना सर्व सरपंचांना करण्यात आल्या आहेत.

चौकट

१०७ गावांत नेमण्यात येणार स्वयंसेवक

शांतिलाल मुथा फाउंडेशन आणि भारतीय जनसंघातर्फे १०७ गावात कोरोना नियंत्रणासाठी स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. हे स्वयंसेवक गावात मार्गदर्शन करणार आहेत. या स्वयंसेवकाचे मोबाईल क्रमांक पोलीस यंत्रणा, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी ग्रामसेवकांना देण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत या गावात विशेष मोहिमा राबविल्या जाणार आहेत.

चौकट

प्रशासनाला गावात तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस यंत्रणेमार्फत या गावात विशेष मोहिमा राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केल्या आहेत. गावाला प्रत्यक्ष भेटी द्याव्या. त्या ठिकाणच्या नागरिकांच्या तपासण्यांचे नियोजन करणे बंधनकारक राहणार आहे. सध्या तपासण्यांसाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र, यासाठी मेलेरिया तपासणी करणाऱ्या यंत्रणेचे सहकार्य घेतले जाणार आहे.

कोट

१५ दिवसांत रुग्णांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट

१०७ गावांत येत्या १५ दिवसांत रुग्णांची संख्या कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाला सूचना करण्यात आल्या असून याचे चांगले परिणाम काही दिवसांतच दिसतील, असा विश्वास आहे.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी