शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शेवटच्या तासातील गर्दीमुळे ताण

By admin | Updated: February 22, 2017 03:20 IST

नवी पेठ-पर्वती (प्रभाग क्रमांक २९) मध्ये रावसाहेब पटवर्धन शाळेत केवळ एका केंद्रामध्ये

पुणे : नवी पेठ-पर्वती (प्रभाग क्रमांक २९) मध्ये रावसाहेब पटवर्धन शाळेत केवळ एका केंद्रामध्ये झालेल्या मतदानासाठी शेवटच्या तासातील गर्दीमुळे निवडणूक यंत्रणेपुढे ताण निर्माण झाला. मतदानाची वेळ संपल्यानंतर पोलिसांनी बंद केलेल्या गेटबाहेर मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यानंतर पांगापांग झाली.या शाळेतील बहुतेक सर्व केंद्रांवर शुकशुकाट असताना अचानक दुपारी सव्वाचारनंतर केंद्र क्रमांक २९वर गर्दी झाली. लोक रांगेत घुसून थांबण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाली. विशेष म्हणजे ७६७ मतदान असलेल्या या केंद्रावर पहिल्या दोन तासात ४.८२, चार तासांत ६.७७, सहा तासांत १०.४३ आणि दुपारी दीड ते साडेतीनपर्यंत १३.५२ टक्के मतदान झाले होते. वेळ संपल्यानंतरही आत येऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची वादावादी होत होती. उपायुक्त पंकज डहाणे यांना ही माहिती समजल्यावर ते कुमक घेऊन आले. त्यानंतर जमाव पांगला. मतदान संपण्यापूर्वी झालेल्या या गर्दीमुळे अनेकांना विस्मय वाटला.(प्रतिनिधी)