शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

असंख्य आव्हाने पेलण्याची ताकत सैन्यदलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:24 IST

भारतीय सैन्यदले ही भारताची आदर्श संस्था आहे. भारतीय सैन्यदलाकडे असंख्य आव्हाने पेलण्याची ताकद असून सैन्य हे काम अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे असे मत मेजर जनरल

पुणे : भारतीय सैन्यदले ही भारताची आदर्श संस्था आहे. भारतीय सैन्यदलाकडे असंख्य आव्हाने पेलण्याची ताकद असून सैन्य हे काम अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे असे मत मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी मंगळवारी व्यक्त केले. पंडित दिनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतंसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा पंडित दिनदयाळ जीवनगौरव पुरस्कार पित्रे यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सैन्य दलातील अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलणाऱ्या पित्रे यांना अकरा हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन सनामानित करण्यात आले. संस्थेच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसंत भसाळकर, सुभाष चुत्तर व संस्थेचे मिलिंद एकबोटे, सुहास पासलकर व्यासपीठावर उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रा.माधुरी जोशी, बापू भेगडे, डॉ.अभय किणीकर, सदानंद सरदेशमुख, अतुल बहिरट, सुभाष इनामदार व पत्रकार मोरेश्वर जोशी यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.पित्रे म्हणाले, ज्यांच्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, अंत:प्रेरणा आहे त्यांना करीयरसाठी भारतीय सैन्यासारखा दुसरा पर्याय नाही. मात्र विविध कारणांनी सैन्य दलाचे चुकीचे चित्र आपल्यासमोर येऊन त्याच्या प्रतिष्ठेचे अवमूल्यन होऊ लागले असल्याची खंतही पित्रे यांनी व्यक्त केली.पुरंदरे म्हणाले, गरज आहे त्या ठिकाणी धावून जाणे गरजेचे आहे. सध्या असणारी अनेक दु:ख आपण ओढवून घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मन सैनिकांना दिले होते. त्याचप्रमाणे आपल्या सैनिकांना केवळ प्रशिक्षण दिले जात नाही, तर अंत:करण दिले जाते.’’