शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

असंख्य आव्हाने पेलण्याची ताकत सैन्यदलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:24 IST

भारतीय सैन्यदले ही भारताची आदर्श संस्था आहे. भारतीय सैन्यदलाकडे असंख्य आव्हाने पेलण्याची ताकद असून सैन्य हे काम अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे असे मत मेजर जनरल

पुणे : भारतीय सैन्यदले ही भारताची आदर्श संस्था आहे. भारतीय सैन्यदलाकडे असंख्य आव्हाने पेलण्याची ताकद असून सैन्य हे काम अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे असे मत मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी मंगळवारी व्यक्त केले. पंडित दिनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतंसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा पंडित दिनदयाळ जीवनगौरव पुरस्कार पित्रे यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सैन्य दलातील अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलणाऱ्या पित्रे यांना अकरा हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन सनामानित करण्यात आले. संस्थेच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसंत भसाळकर, सुभाष चुत्तर व संस्थेचे मिलिंद एकबोटे, सुहास पासलकर व्यासपीठावर उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रा.माधुरी जोशी, बापू भेगडे, डॉ.अभय किणीकर, सदानंद सरदेशमुख, अतुल बहिरट, सुभाष इनामदार व पत्रकार मोरेश्वर जोशी यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.पित्रे म्हणाले, ज्यांच्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, अंत:प्रेरणा आहे त्यांना करीयरसाठी भारतीय सैन्यासारखा दुसरा पर्याय नाही. मात्र विविध कारणांनी सैन्य दलाचे चुकीचे चित्र आपल्यासमोर येऊन त्याच्या प्रतिष्ठेचे अवमूल्यन होऊ लागले असल्याची खंतही पित्रे यांनी व्यक्त केली.पुरंदरे म्हणाले, गरज आहे त्या ठिकाणी धावून जाणे गरजेचे आहे. सध्या असणारी अनेक दु:ख आपण ओढवून घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मन सैनिकांना दिले होते. त्याचप्रमाणे आपल्या सैनिकांना केवळ प्रशिक्षण दिले जात नाही, तर अंत:करण दिले जाते.’’