शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

असंख्य आव्हाने पेलण्याची ताकत सैन्यदलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:24 IST

भारतीय सैन्यदले ही भारताची आदर्श संस्था आहे. भारतीय सैन्यदलाकडे असंख्य आव्हाने पेलण्याची ताकद असून सैन्य हे काम अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे असे मत मेजर जनरल

पुणे : भारतीय सैन्यदले ही भारताची आदर्श संस्था आहे. भारतीय सैन्यदलाकडे असंख्य आव्हाने पेलण्याची ताकद असून सैन्य हे काम अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे असे मत मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी मंगळवारी व्यक्त केले. पंडित दिनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतंसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा पंडित दिनदयाळ जीवनगौरव पुरस्कार पित्रे यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सैन्य दलातील अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलणाऱ्या पित्रे यांना अकरा हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन सनामानित करण्यात आले. संस्थेच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसंत भसाळकर, सुभाष चुत्तर व संस्थेचे मिलिंद एकबोटे, सुहास पासलकर व्यासपीठावर उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रा.माधुरी जोशी, बापू भेगडे, डॉ.अभय किणीकर, सदानंद सरदेशमुख, अतुल बहिरट, सुभाष इनामदार व पत्रकार मोरेश्वर जोशी यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.पित्रे म्हणाले, ज्यांच्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, अंत:प्रेरणा आहे त्यांना करीयरसाठी भारतीय सैन्यासारखा दुसरा पर्याय नाही. मात्र विविध कारणांनी सैन्य दलाचे चुकीचे चित्र आपल्यासमोर येऊन त्याच्या प्रतिष्ठेचे अवमूल्यन होऊ लागले असल्याची खंतही पित्रे यांनी व्यक्त केली.पुरंदरे म्हणाले, गरज आहे त्या ठिकाणी धावून जाणे गरजेचे आहे. सध्या असणारी अनेक दु:ख आपण ओढवून घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मन सैनिकांना दिले होते. त्याचप्रमाणे आपल्या सैनिकांना केवळ प्रशिक्षण दिले जात नाही, तर अंत:करण दिले जाते.’’