शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

धनगर समाजाची ताकद कुल यांच्या पाठीशी

By admin | Updated: October 11, 2014 23:41 IST

बारामती येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक सूतोवाच केले. त्यामुळे धनगर आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे.

यवत : बारामती येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक सूतोवाच केले. त्यामुळे धनगर आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. धनगर समाजाच्या आरक्षण लढय़ात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार राहुल कुल यांनी दिलेल्या योगदानामुळे तालुक्यातील धनगर समाजाने कुल यांनाच मतदान करावे, असे आवाहन पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष हरीश खोमणो यांनी केले.
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यभर आंदोलने व उपोषण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक टाळाटाळ करून महाराष्ट्रातील धनगर समाजाला वेठीस धरले. तालुक्याच्या आमदारांनी शपथ घेऊन आरक्षण आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते त्यांनी पाळले नाही. तसेच, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारने धनगर आरक्षण कृती समितीशी ठोस चर्चा केली नाही. राहुल कुल यांनी आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, तर दिलाच शिवाय यापुढील काळात रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचे जाहीर केले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीच्या सभेत धनगर समाजाबाबत राज्य सरकारने अन्याय केल्याचे सांगितले आणि आरक्षणाबाबत सकारात्मक सुतोवाच केले. धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ यांनी सर्व सदस्यांसह समाजाला विश्वास देऊन याच सभेमध्ये भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी व काँग्रेसवर राग व्यक्त केला. त्यामुळे आता समाजातील नेत्यांनी, पदाधिका:यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी राहुल कुल यांच्या पाठीशी एकजुटीने ताकद उभी करावी, असे आवाहन खोमणो यांनी केले.
आरक्षणविरोधातील लढय़ावेळी बारामतीमध्ये सहा लाखांच्या आसपास धनगर समाज एकवटला. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी सरकारने आरक्षणविरोधी भूमिका घेतल्याने धनगर आरक्षण कृती समितीने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या विरोधातच काम करण्याची भूमिका घेतली व तसा जाहीर ठराव केला. (वार्ताहर)
 
माळी समाजाने कुल यांना मतदान करावे : भागवत
जिल्ह्यात माळी समाजाची संख्या मोठी असतानादेखील राष्ट्रवादी काँग्रेसने एकाही विधानसभा मतदार संघात माळी समाजाला उमेदवारी दिली नाही. आंबेगाव, पुरंदर, हडपसर येथे अनुक्रमे सुरेश गोरे, प्रा. दिगंबर दुगार्डे व वैशाली बनकर हे सक्षम उमेदवार असताना देखील त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.  दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांनी समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपदावरून घालविण्यासाठीच्या अर्जावर पहिली सही केली होती. 
 
4खामगाव येथे काढलेल्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यावेळी कुल म्हणाले, दौंड तालुक्याच्या विकासावर गप्पा मारणा:या आमदार रमेश थोरात यांनी ‘जाऊ तिथं खाऊ’ याप्रमाणो आपल्या जवळच्या नातेवाईक मंडळींना हताशी धरून केवळ नातलगांचा विकास केला. वाळू, मुरूममाफिया तसेच रस्त्यांच्या कामाबाबत ठेकेदारांचे हित जोपासून संपूर्ण तालुक्यात रस्त्याची दर्जाहीन कामे करण्यात येऊन जनतेच्या मतांवर आमदार झालेल्या जनतेचा विश्वासघात केला आहे. सध्या सत्ताधारी मंडळींकडे आमच्यावर टीका करण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही. म्हणून केवळ भीमा-पाटस कारखान्याचे राजकीय भांडवल केले जात आहे.
 
4पाटेठाण : राष्ट्रवादीचे सगळेच डाव आता संपुष्टात येऊ लागले आहेत. जनताच आता त्यांना धोबीपछाड डाव मतांच्या रूपातून टाकल्याशिवाय राहणार नाही, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार राहुल कुल यांनी व्यक्त केले.