शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गतवर्षी लॉकडाऊनमध्ये घरीच अडकलेली अधिकांश मंडळी सोशल मीडिया आणि तेच तेच फॉरवर्ड मेसेज वाचून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गतवर्षी लॉकडाऊनमध्ये घरीच अडकलेली अधिकांश मंडळी सोशल मीडिया आणि तेच तेच फॉरवर्ड मेसेज वाचून किंवा पोस्ट शेअर करून अक्षरश: कंटाळली होती. त्यातच ग्रंथालयं... पुस्तक दालनं देखील बंद. मग अशा मंडळींना वाचनासाठी उत्तम खाद्य देण्याकरिता व्हॉट्सअपवर एक ग्रुप साकार झाला अन् राज्यभरातील कथाकार या ग्रुपद्वारे एकत्र आले. या कथाकारांनी आपल्या कथा शेअर केल्या आणि पाहता पाहता या कथांना राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळू लागला... यातील कुणालाही कधी वाटलं देखील नाही की याचं कधी पुस्तक आकाराला येईल. पण एका व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे सुरू झालेला कथाकारांचा हा अनोखा प्रवास कथासंग्रहाच्या रूपाने आता वाचकांसमोर येत आहे. ‘सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’ असे या कथासंग्रहाचे नाव असून, या माध्यमातून कथाकारांच्या वैविध्यपूर्ण कथांचे विश्व अनुभवायला मिळणार आहे.

ग्रामीण कथालेखक बबन पोतदार यांनी लॉकडाऊनकाळात हा अभिनव प्रयोग साकार केला अन् तो पुस्तकरूपात परिवर्तित झाला. अस्सल गावरान भाषेचा तडका तोही एकदम झणझणीत असा या कथांमधून वाचकांना चाखायला मिळणार आहे. पोतदार यांनी या प्रयोगाविषयी ‘लोकमत’ला सांगितले की, गेल्या वर्षी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून राज्यभरातील कथाकारांना एकत्र आणले.

सुरुवातीला रोज एका कथाकाराची कसदार कथा शेअर करीत असे. त्या कथेसोबत कथाकाराचा परिचय आणि कथेमागील बीज याचाही समावेश असायचा. या कथेवर पुढे आठवडाभर चर्चा रंगू लागली. एका कथाकारांच्या लेखनावर कसलेल्या साहित्यिकांकडून परीक्षणही होऊ लागले. या गटामध्ये देशातील विशेषत: महाराष्ट्रातील आणि बेळगाव सीमा भागातील विविध भागांत नोकरी, उद्योग करणाऱ्या लेखकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक लेखनात त्या भागातील प्रादेशिकता, वेगळ्या चालीरीती, तेथील परंपरा, भाषेचा लहेजा उतरलेला असायचा. कथेतील गोडवा अनुभवायला मिळाल्याने वाचकांची अनुभवसंपन्नता अधिक रूंदावत गेली. पुढे याच २०० हून अधिक असणाऱ्या गट सदस्यांमधून निवडक कथांचा संग्रह प्रकाशित करण्याची संकल्पना पुढे आली आणि तिने मूर्त स्वरूपही धारण केले. या कथासंग्रहात माझ्यासह सुनील वेदपाठक, लक्ष्मीकमल गेडाम, संध्या धर्माधिकारी, राजेंद्र भोसले, मंगला बक्षी, वंदना धर्माधिकारी, अजित काटकर, सुवर्णा मस्कर, प्रशांत सातपुते आदी २० कथाकारांच्या कथांचा समावेश आहे. साहित्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची १६ पानांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.