शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गतवर्षी लॉकडाऊनमध्ये घरीच अडकलेली अधिकांश मंडळी सोशल मीडिया आणि तेच तेच फॉरवर्ड मेसेज वाचून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गतवर्षी लॉकडाऊनमध्ये घरीच अडकलेली अधिकांश मंडळी सोशल मीडिया आणि तेच तेच फॉरवर्ड मेसेज वाचून किंवा पोस्ट शेअर करून अक्षरश: कंटाळली होती. त्यातच ग्रंथालयं... पुस्तक दालनं देखील बंद. मग अशा मंडळींना वाचनासाठी उत्तम खाद्य देण्याकरिता व्हॉट्सअपवर एक ग्रुप साकार झाला अन् राज्यभरातील कथाकार या ग्रुपद्वारे एकत्र आले. या कथाकारांनी आपल्या कथा शेअर केल्या आणि पाहता पाहता या कथांना राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळू लागला... यातील कुणालाही कधी वाटलं देखील नाही की याचं कधी पुस्तक आकाराला येईल. पण एका व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे सुरू झालेला कथाकारांचा हा अनोखा प्रवास कथासंग्रहाच्या रूपाने आता वाचकांसमोर येत आहे. ‘सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’ असे या कथासंग्रहाचे नाव असून, या माध्यमातून कथाकारांच्या वैविध्यपूर्ण कथांचे विश्व अनुभवायला मिळणार आहे.

ग्रामीण कथालेखक बबन पोतदार यांनी लॉकडाऊनकाळात हा अभिनव प्रयोग साकार केला अन् तो पुस्तकरूपात परिवर्तित झाला. अस्सल गावरान भाषेचा तडका तोही एकदम झणझणीत असा या कथांमधून वाचकांना चाखायला मिळणार आहे. पोतदार यांनी या प्रयोगाविषयी ‘लोकमत’ला सांगितले की, गेल्या वर्षी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून राज्यभरातील कथाकारांना एकत्र आणले.

सुरुवातीला रोज एका कथाकाराची कसदार कथा शेअर करीत असे. त्या कथेसोबत कथाकाराचा परिचय आणि कथेमागील बीज याचाही समावेश असायचा. या कथेवर पुढे आठवडाभर चर्चा रंगू लागली. एका कथाकारांच्या लेखनावर कसलेल्या साहित्यिकांकडून परीक्षणही होऊ लागले. या गटामध्ये देशातील विशेषत: महाराष्ट्रातील आणि बेळगाव सीमा भागातील विविध भागांत नोकरी, उद्योग करणाऱ्या लेखकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक लेखनात त्या भागातील प्रादेशिकता, वेगळ्या चालीरीती, तेथील परंपरा, भाषेचा लहेजा उतरलेला असायचा. कथेतील गोडवा अनुभवायला मिळाल्याने वाचकांची अनुभवसंपन्नता अधिक रूंदावत गेली. पुढे याच २०० हून अधिक असणाऱ्या गट सदस्यांमधून निवडक कथांचा संग्रह प्रकाशित करण्याची संकल्पना पुढे आली आणि तिने मूर्त स्वरूपही धारण केले. या कथासंग्रहात माझ्यासह सुनील वेदपाठक, लक्ष्मीकमल गेडाम, संध्या धर्माधिकारी, राजेंद्र भोसले, मंगला बक्षी, वंदना धर्माधिकारी, अजित काटकर, सुवर्णा मस्कर, प्रशांत सातपुते आदी २० कथाकारांच्या कथांचा समावेश आहे. साहित्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची १६ पानांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.