शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

इंदापूरला वादळी वाऱ्याचा तडाखा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : इंदापूर तालुक्याला गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. यात तालुक्यातील केळीबागांना याचा सर्वाधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इंदापूर : इंदापूर तालुक्याला गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. यात तालुक्यातील केळीबागांना याचा सर्वाधिक फटका बसला. गंगावळण, कळाशी तसेच निमगाव केतकी व इतर परिसरात सर्वाधिक नुकसान झाले. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरूपात भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केली आहे.

इंदापुर, बारामती तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले. सकाळी ११ वाजता जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडाली. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कोरोनामुळे आधीच शेतकरी अडचणीत होते. त्यात शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून केळीचे पीक व उसाचे पीक यंदा जोमात आणले होते. मात्र, वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे केळीच्या बागा लोळल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना मशागतीचा खर्च देखील हातामध्ये पडणार नाही. वाऱ्याच्या झोतामुळे उसाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील मोठ्या प्रमाणात ऊस जागीच झोपले आहेत. या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल असाही आशावाद महारुद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

कोट

आमच्या शेतातील तब्बल अडीच एकर केळी काढणीसाठी आली होती. साधारणपणे आठ ते साडेआठ लाख रुपये या वेळी बागेत मधून उत्पन्न हमखास मिळणार होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर केळी कोसळली आहे. सर्व बाग भुईसपाट झाल्यामुळे हे उत्पन्न मातीमोल झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी यांना शासनाच्या माध्यमातून रोख स्वरूपात भरपाई मिळावी.

-विनोद पाटील, शेतकरी

---

चौकट

निमसाखर येथेही पाऊस

निमसाखर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. सध्या उन्हाच्या झळा दिवसभर लागत असून उन्हामुळे लोक हैराण होत असताना झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

भवानीनगर, सणसरला वादळी पावसाने झोडपले

बारामती : इंदापूर तालुक्याला गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपले. सणसर भवानीनगर भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळाने या भागातील अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे इंदापूर रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र होते.

येथील ग्रामस्थांनी वादळी वाऱ्यासह तुफानी पावसाचा अनुभव घेतला. एक तासाहून अधिक काळ वादळी वारे आणि पावसाचे तांडव सुरू होते. तसेच पावसाने ठिकठिकाणी पाणी साठल्याने परिसराला छोट्या तळ्याचे स्वरूप आले होते. या पावसाने विजेचे खांब जमीनदोस्त झाले. परिणामी वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात आहे.

भवानीनगर लगतच्या शेरपुलावरील भरावावर बाभळीचे झाड पडल्याने येथे एकेरी वाहतूक सुरू आहे. भवानीनगर येथील साखर कारखान्यासमोरील तीन मोठी झाडे पडल्याने वाहतूक थांबली होती. शेवटी पोलिसांनी रस्त्यावर उतरत येथे एकेरी वाहतूक सुरळीत केली आहे.

सायंकाळी पावणेसातच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरु झाला. यावेळी काही काळ गारांचा देखील पाऊस सुरु झाला होता. मात्र,७ च्या सुमारास अचानक वादळी वारे वाहू लागले. यामध्ये सापडलेली वाहने, नागरिक भयभीत झालें. काही ज्येष्ठ नागरिकांना येथील युवकांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे अनर्थ टळला. वादळी वारे सुरु असतानाच पाऊस सुरु झाल्याने रस्त्यावरील नागरिक आणखी धास्तावले. पाऊस कमी होई पर्यन्त अनेक नागरिक मिळेल त्या आडोशाला मुठीत जीव घेऊन थांबले होते. पावणे आठच्या सुमारास पाऊस थांबला. त्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

चौकट

सणसरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालें. या पावसामुळे शेतकऱ्याचे ऊस, मका, कडवळ ही पिके जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे गुरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. केळी सह वांगी, टोमॅटो, मिरची या पिकांचे ही पावसामुळे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी आडसाली उसासाठी सऱ्या काढल्या आहेत. त्या सऱ्यांमध्ये पाणी साठले त्यामुळे या मोकळ्या सऱ्यांमध्ये गवत येऊन त्याचाही खर्च ऊस लागणीच्या अगोदर शेतकऱ्यास सोसावा लागणार आहे. एकंदरितच अचानक आलेल्या आजच्या पावसामुळे कोरोना मुळे अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत जाणार आहे. तालुक्यातील निमसाखर येथे मोठ्या प्रमाणत सुसाट वेगाने वारे वाहिले. परंतू, पाऊस मात्र रिमझिम झाला. सध्या इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊसाला सुरुवात झाली असल्याने काही प्रमाणात पुढिल काळात पाणी टंचाई पासून उसत मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गा मधुन व्यक्त केली जात आहे.

फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील गंगावळण कळाशी भागातील केळी बागा भूईसपाट झाल्या