शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

इंदापूरला वादळी वाऱ्याचा तडाखा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : इंदापूर तालुक्याला गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. यात तालुक्यातील केळीबागांना याचा सर्वाधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इंदापूर : इंदापूर तालुक्याला गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. यात तालुक्यातील केळीबागांना याचा सर्वाधिक फटका बसला. गंगावळण, कळाशी तसेच निमगाव केतकी व इतर परिसरात सर्वाधिक नुकसान झाले. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरूपात भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केली आहे.

इंदापुर, बारामती तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले. सकाळी ११ वाजता जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडाली. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कोरोनामुळे आधीच शेतकरी अडचणीत होते. त्यात शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून केळीचे पीक व उसाचे पीक यंदा जोमात आणले होते. मात्र, वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे केळीच्या बागा लोळल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना मशागतीचा खर्च देखील हातामध्ये पडणार नाही. वाऱ्याच्या झोतामुळे उसाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील मोठ्या प्रमाणात ऊस जागीच झोपले आहेत. या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल असाही आशावाद महारुद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

कोट

आमच्या शेतातील तब्बल अडीच एकर केळी काढणीसाठी आली होती. साधारणपणे आठ ते साडेआठ लाख रुपये या वेळी बागेत मधून उत्पन्न हमखास मिळणार होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर केळी कोसळली आहे. सर्व बाग भुईसपाट झाल्यामुळे हे उत्पन्न मातीमोल झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी यांना शासनाच्या माध्यमातून रोख स्वरूपात भरपाई मिळावी.

-विनोद पाटील, शेतकरी

---

चौकट

निमसाखर येथेही पाऊस

निमसाखर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. सध्या उन्हाच्या झळा दिवसभर लागत असून उन्हामुळे लोक हैराण होत असताना झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

भवानीनगर, सणसरला वादळी पावसाने झोडपले

बारामती : इंदापूर तालुक्याला गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपले. सणसर भवानीनगर भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळाने या भागातील अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे इंदापूर रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र होते.

येथील ग्रामस्थांनी वादळी वाऱ्यासह तुफानी पावसाचा अनुभव घेतला. एक तासाहून अधिक काळ वादळी वारे आणि पावसाचे तांडव सुरू होते. तसेच पावसाने ठिकठिकाणी पाणी साठल्याने परिसराला छोट्या तळ्याचे स्वरूप आले होते. या पावसाने विजेचे खांब जमीनदोस्त झाले. परिणामी वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात आहे.

भवानीनगर लगतच्या शेरपुलावरील भरावावर बाभळीचे झाड पडल्याने येथे एकेरी वाहतूक सुरू आहे. भवानीनगर येथील साखर कारखान्यासमोरील तीन मोठी झाडे पडल्याने वाहतूक थांबली होती. शेवटी पोलिसांनी रस्त्यावर उतरत येथे एकेरी वाहतूक सुरळीत केली आहे.

सायंकाळी पावणेसातच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरु झाला. यावेळी काही काळ गारांचा देखील पाऊस सुरु झाला होता. मात्र,७ च्या सुमारास अचानक वादळी वारे वाहू लागले. यामध्ये सापडलेली वाहने, नागरिक भयभीत झालें. काही ज्येष्ठ नागरिकांना येथील युवकांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे अनर्थ टळला. वादळी वारे सुरु असतानाच पाऊस सुरु झाल्याने रस्त्यावरील नागरिक आणखी धास्तावले. पाऊस कमी होई पर्यन्त अनेक नागरिक मिळेल त्या आडोशाला मुठीत जीव घेऊन थांबले होते. पावणे आठच्या सुमारास पाऊस थांबला. त्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

चौकट

सणसरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालें. या पावसामुळे शेतकऱ्याचे ऊस, मका, कडवळ ही पिके जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे गुरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. केळी सह वांगी, टोमॅटो, मिरची या पिकांचे ही पावसामुळे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी आडसाली उसासाठी सऱ्या काढल्या आहेत. त्या सऱ्यांमध्ये पाणी साठले त्यामुळे या मोकळ्या सऱ्यांमध्ये गवत येऊन त्याचाही खर्च ऊस लागणीच्या अगोदर शेतकऱ्यास सोसावा लागणार आहे. एकंदरितच अचानक आलेल्या आजच्या पावसामुळे कोरोना मुळे अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत जाणार आहे. तालुक्यातील निमसाखर येथे मोठ्या प्रमाणत सुसाट वेगाने वारे वाहिले. परंतू, पाऊस मात्र रिमझिम झाला. सध्या इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊसाला सुरुवात झाली असल्याने काही प्रमाणात पुढिल काळात पाणी टंचाई पासून उसत मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गा मधुन व्यक्त केली जात आहे.

फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील गंगावळण कळाशी भागातील केळी बागा भूईसपाट झाल्या