शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

विद्युत खांबावरील आकड्यांना अटकाव

By admin | Updated: January 7, 2016 01:31 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) तारांवर आकडे टाकून बेकायदापणे वीजजोड घेण्याचे प्रकार शहरातील काही भागांत सर्रासपणे सुरू आहेत

पिंपरी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) तारांवर आकडे टाकून बेकायदापणे वीजजोड घेण्याचे प्रकार शहरातील काही भागांत सर्रासपणे सुरू आहेत. हे रोखण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामुळे वीजचोरीला आळा बसणार असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. दाट वस्तीच्या भागात तारेवर आकडे टाकून वीजचोरी केली जाते. सायंकाळनंतर हे आकडे टाकले जातात. महावितरणचे पथक येताच ते काढून घेतले जातात. यामुळे कारवाई करताना पथकास बंधने येतात. त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. या तारांतून वीजप्रवाह जाणार नाही, अशा एअर बंच कंडक्टर (एबी) इन्सुलेशन केबल जोडण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या तारा काढून त्या ठिकाणी ही एबी केबल जोडण्यात येत आहे. त्या केबलवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नसल्यामुळे अशा चोरीस पूर्णपणे अटकाव होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, अपघात होत असलेल्या ठिकाणी या प्रकारच्या केबल बसविण्यात येत आहेत. विशेष मोहिमेत हे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. शहरभरात या प्रकारे एबी केबल टाकले जाणार आहेत. पिंपरी बाजारपेठेत अशा प्रकारे केबल जोडल्या आहेत. भाटनगर येथील २६ खांब आणि लिंक रोड येथील २२ खांबांवर, त्याचबरोबर मिलिंदनगर भागात अशा प्रकारची केबल जोडली आहे. गांधीनगरातील अनेक खांबांवर अशा प्रकारे केबलजोडणी केली गेली आहे. याचबरोबर शहरातील झोपडपट्ट्या, वस्त्या अशा दाट भागातील वीजवाहक तारांवर केबलजोडणी केली गेली आहे. भोसरीतील महात्मा फुले झोपडपट्टीतील अनेक खांबांवर एबी केबल बसविल्या आहेत. एबी केबलमुळे आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. वीजचोरीच्या माध्यमातून होणारे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान यामुळे टाळण्यास मदत होणार आहे. तसेच, वीजचोरी करताना होणाऱ्या दुर्घटना रोखल्या जातील. वीज चोरून घेण्यापेक्षा थेट मीटरजोड घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत नागरिकांना त्वरित वीज मीटरजोड दिला जात आहे. झोपडपट्टी भागात याप्रमाणे अनेक मीटरजोड दिले गेले आहेत. वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने विशेष तपासणी मोहीम राबवीत आहे. यासाठी स्वतंत्र पथकांची निर्मिती केली गेली आहे. आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कारवाई केली आहे. यामध्ये वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.(प्रतिनिधी)