शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

चासकमान धरणामधून विसर्ग केला बंद

By admin | Updated: January 19, 2016 01:41 IST

चासकमान धरणातून उजनी धरणात सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार ०.७३ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यावर

चासकमान : चासकमान धरणातून उजनी धरणात सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार ०.७३ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यावर रविवारी (दि. १७) रात्री उशिरा हे पाणी बंद करण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता एस. जी. शहापुरे व शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी दिली.जिल्ह्यातील धरणांमधून उजनी धरणात पाणी सोडण्याचे नियोजन आॅक्टोबर महिन्यापासून सुरू झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी स्थानिक पाणीटंचाई निवारणासाठी जलसंपत्ती प्राधिकरणाकडे उजनी धरणात पाणी सोडण्याची मागणी केली होती. पंरतु यंदा पाऊसच कमी झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातीलच धरणे भरली नाहीत. याविरुद्ध आमदार सुरेश गोरे व बाबूराव पाचर्णे यांनी जलप्राधिकरणापुढे भूमिका मांडली. मागील आठवड्यात जलप्राधिकरणाने उजनीत १० टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देत भामा-आसखेड धरणातून ६१.५१ एम.एम.क्यूब म्हणजेच सुमारे २ टीएमसी व चासकमान धरणातून २०.७० एम.एम.क्यूब म्हणजेच ०.८ टीएमसी पाणी सोडण्याच्या दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यानुसार कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार यांच्या आदेशानुसार बुधवारपासून (दि.१३) या दोन्ही धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. धरणाच्या चार दरवाजांद्वारे सुमारे ०.७३ टीएमसी पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. (वार्ताहर)