शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

चासकमान धरणामधून विसर्ग केला बंद

By admin | Updated: January 19, 2016 01:41 IST

चासकमान धरणातून उजनी धरणात सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार ०.७३ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यावर

चासकमान : चासकमान धरणातून उजनी धरणात सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार ०.७३ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यावर रविवारी (दि. १७) रात्री उशिरा हे पाणी बंद करण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता एस. जी. शहापुरे व शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी दिली.जिल्ह्यातील धरणांमधून उजनी धरणात पाणी सोडण्याचे नियोजन आॅक्टोबर महिन्यापासून सुरू झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी स्थानिक पाणीटंचाई निवारणासाठी जलसंपत्ती प्राधिकरणाकडे उजनी धरणात पाणी सोडण्याची मागणी केली होती. पंरतु यंदा पाऊसच कमी झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातीलच धरणे भरली नाहीत. याविरुद्ध आमदार सुरेश गोरे व बाबूराव पाचर्णे यांनी जलप्राधिकरणापुढे भूमिका मांडली. मागील आठवड्यात जलप्राधिकरणाने उजनीत १० टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देत भामा-आसखेड धरणातून ६१.५१ एम.एम.क्यूब म्हणजेच सुमारे २ टीएमसी व चासकमान धरणातून २०.७० एम.एम.क्यूब म्हणजेच ०.८ टीएमसी पाणी सोडण्याच्या दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यानुसार कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार यांच्या आदेशानुसार बुधवारपासून (दि.१३) या दोन्ही धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. धरणाच्या चार दरवाजांद्वारे सुमारे ०.७३ टीएमसी पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. (वार्ताहर)