शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: July 25, 2015 05:00 IST

पुरंदर उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण करून बारामतीच्या जिरायती भागात पाणी सोडावे. पशुधन वाचविण्यासाठी चारा डेपो सुरू करावेत

लोणी भापकर : पुरंदर उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण करून बारामतीच्या जिरायती भागात पाणी सोडावे. पशुधन वाचविण्यासाठी चारा डेपो सुरू करावेत. यासह अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील १६ जिरायती गावातील ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. २४) लोणी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. या योजनचे वीजबील टंचाई निवारण निधीतून शासनाने भरावे, ही मागणी केली. रास्तारोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली. बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीच्या दक्षिणेकडील जवळपास २२ गावांतील अर्थकारण केवळ पावसावर अवलंबून आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेतून यातील १६ गावांतील सुमारे २५ हजार एकर क्षेत्र ओलीताखाली येणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच मागील चार वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने ही गावे पाणी, चारा व रोजगारटंचाई झेलत आहेत. बहुतांश कुटुंबांची रोजीरोटी दूध उत्पादनावर अवलंबून आहे. मात्र चाऱ्याअभावी दारातील दुभती जनावरे सांभाळणे जिकिरीचे होऊ लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकजण दुभती जनावरे विकू लागले आहेत. तर या भागातील अनेक गावे व वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.मागील काही काळात या भागातील पाझर तलाव बंधारे, ओढा खोलीकरणाची कामे झाली आहेत. तर पुरंदर योजनचे काम काही भागात पूर्ण झाले आहे. ेत्यातून पाणी सोडून खोलीकरण झालेल्या ठिकाणी पाणी सोडण्याची मागणी येथील ग्रामस्थ सातत्याने करीत आहेत. मात्र, त्याकडे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज लोणीभापकरसह १६ गावांतील ग्रामस्थांनी बारामती-मोरगाव रस्त्यावर लोणी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी पुरंदर उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे व पाणी सोडावे. त्यासाठीचा वीजखर्च टंचाई निवारण निधीतून शासनाने भागवावा. तसेच पशुधन वाचविण्यासाठी जिरायती भागात तातडीने चारा डेपो सुरू करावेत. जिरायती गावांतील प्रत्यक्ष पीक परिस्थिती पाहून आणेवारी मोजावी. पुरंदर योजनेतून वंचित राहिलेल्या भागाचे फेरसर्वेक्षण करावे. त्या भागात योजनेचे पाणी द्यावे. या मागण्यांचे निवेदन या वेळी शासनाला देण्यात आले.या वेळी बारामतीचे नायब तहसीलदार शामराव अडागळे, पुरंदर उपसाचे एम. आर. ननावरे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सतीश शिंदे तसेच १६ गावांतील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)