शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

रेल्वे कुरकुंभ मोरीत रास्ता रोको

By admin | Updated: June 15, 2017 04:46 IST

येथील रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दौंड नगर परिषद, रेल्वे प्रशासन यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : येथील रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दौंड नगर परिषद, रेल्वे प्रशासन यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. मंगळवारी (दि. १३) सायंकाळी शहरात तुफान पाऊस झाला. रेल्वे कुरकुंभ मोरीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. तेव्हा अजनुज (ता. श्रीगोंदा) येथील महादेव मारुती शितोळे या व्यक्तीचा पाय रेल्वेच्या नाल्यात घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले. येथील नेने चाळीतील नाल्यात या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीच्या मृत्यूला नगर परिषद आणि रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीने जोर धरला होता. या घटनेमुळे नगर परिषद आणि रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांत संतापाची लाट होती. दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती. नवीन रेल्वे कुरकुंभ मोरीचे काम झाले पाहिजे. कुरकुंभ मोरीचे काम अडविणाऱ्या राजकीय मंडळींना धडा शिकवला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या आशयाच्या आंदोलक घोषणा देत होते. या वेळी शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे. शिवसेनेचे राजेंद्र खटी, अनिल सोनवणे, संतोष जगताप, आनंद पळसे, गणेश दळवी, आकाश झोजे, कैलास शहा, नामदेव राहिंज, रूपेश बंड, अनिकेत बहिरमल, शैलेश पिल्ले, अजित फुटाणे, श्रीराम ग्रामपुरोहित, विक्रम इंगवले, गणेश पवार उपस्थित होते. रेल्वेच्या नाल्यावर ढापे टाकले जातील, असे आश्वासन मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिल्यावर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी आक्रमकरेल्वे कुरकुंभ मोरीच्या परिसरातील रेल्वेच्या नाल्यात महादेव शितोळे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा नगर परिषद आणि रेल्वे प्रशासन यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पोलीस ठाण्यामध्ये आक्रमक पवित्रा घेतला. या वेळी बादशहा शेख, शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, इंद्रजित जगदाळे, विलास शितोळे, वसीम शेख, रिजवाना पानसरे, संध्या डावखर, ज्योती राऊत, प्रणोती चलवादी, मोहन नारंग, गौतम साळवे, गुरुमुख नारंग, सोहेल खान, विनोद नगरवाल यांनी सांगितले, की ४८ तासांच्या आत चौकशी करून कारवाई करतो. पोलीस म्हणाले, की तातडीने आताच गुन्हा दाखल झाला पाहिजे....आणि काळाने झडप घातली : महादेव शितोळे अजनुज (ता. श्रीगोंदा) येथून पुण्याला निघाले होते. रेल्वे स्टेशन परिसरात ते पोहोचले. परंतु जोराचा पाऊस सुरू झाल्याने त्यांनी पुण्याला जाण्याचे रद्द केले आणि घरी परत येताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.