शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
4
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
5
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
6
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
7
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
8
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
9
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
10
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी
13
कामगारांच्या कामाचे ९ चे झाले १२ तास, पण ओव्हरटाइमचा मिळणार जादा मोबदला; रजेचेही निकष बदलले
14
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
15
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
16
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
17
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
18
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
19
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
20
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: May 28, 2017 03:49 IST

इंदापूर तालुक्यात सध्या पाणी पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . इंदापूर तालुक्यातील गोतंडी चोपनफाटा या फाट्यावरील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी

- लोकमत न्यूज नेटवर्क

निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यात सध्या पाणी पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . इंदापूर तालुक्यातील गोतंडी चोपनफाटा या फाट्यावरील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. त्यामुळे आज येथील शेतकऱ््यांनी इंदापूर बारामती राज्य महामार्ग सुमारे एक तासापेक्षा जादा वेळ रोखून धरला. आंदोलनामुळे राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.पाण्याअभावी शेतातील पिके पाण्यावाचून जळून चालली आहेत. लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. आज या रास्ता रोकोत इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणेही सामील झाले होते. तर येथील शेतकऱ्यांंना पाण्यावाचून वंचीत ठेवल्याने आमदार भरणे यांनी पाण्याच्या व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या या रास्त मागणीला माझा पूर्ण पाठींबा आहे ,असे सांगीतले. या वेळी भरणे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांना संपर्क साधला. या वेळी परिसरातील शेतकरी कडक उन्हामध्ये मोठ्या संख्येने या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ लोकांनी महामार्ग रोखून धरला. शेवटी आमदार भरणे यांनी यांनी शेतकऱ्यांंशी चर्चा करून महामार्ग मोकळा केला. या वेळी पाटील यांनी देखील राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे व पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी संपर्क साधून वंचित शेतकऱ्यांना चालु आर्वतनातील पाणी तातडीने देण्याची मागणी केली.५४ फाट्यावरील शेतीला वेळेवर पाणी न मिळाल्याने गोतोंडी, निमसाखर, हगारेवाडी, शिरसटवाडी, घोरपडवाडी, दगडवाडी, जैनवाडीसह इतर गावातील पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला. केवळ तोंड बघून सध्या जलसंपदा विभागाचा कारभार चालू आहे. नीरा डावा कालव्यावरील ५४ फाट्याबरोबरच अन्य वितरीकेवरील पिकांना पाणी न मिळताच बंद झाले. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ््यांवर व इंदापूर तालुक्यावर शेतीच्या पाण्याच्या बाबतीत अन्याय झाला आहे. जलसंपदा विभागाने निरा डावा कालव्यातुन पुर्ण क्षमतेने पाणी आणून शेतीला तातडीने पाणी देण्याचे नियोजन करून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिलेच पाहीजे, अन्यथा पुणे येथील सिंचन भवनावरती शेतक ऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी मोर्चा काढण्याचा, इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी दिला.रास्ता रोको दरम्यान थोड्या उशिरा हर्षवर्धन पाटील यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची भेट घेउन पाठींबा व्यक्त केला. शेतकरी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली. या वेळी पाटील पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना भाटघर धरणाच्या नीरा डावा कालव्यातून येणारे पाणी हे उन्हाळी हंगामातील पिकांना देण्याचे नियोजनामध्ये ठरले आहे. फाटा क्र. ५४ वरील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी न मिळाल्यामुळे पिके पूर्णपणे जळालेली आहेत. भाटघरच्या धरणातील पाण्यावर इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी गेले कुठे? शेतीला पाणी का मिळत नाही? यास जबाबदार कोण आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी व्यक्त केली .