शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: May 28, 2017 03:49 IST

इंदापूर तालुक्यात सध्या पाणी पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . इंदापूर तालुक्यातील गोतंडी चोपनफाटा या फाट्यावरील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी

- लोकमत न्यूज नेटवर्क

निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यात सध्या पाणी पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . इंदापूर तालुक्यातील गोतंडी चोपनफाटा या फाट्यावरील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. त्यामुळे आज येथील शेतकऱ््यांनी इंदापूर बारामती राज्य महामार्ग सुमारे एक तासापेक्षा जादा वेळ रोखून धरला. आंदोलनामुळे राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.पाण्याअभावी शेतातील पिके पाण्यावाचून जळून चालली आहेत. लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. आज या रास्ता रोकोत इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणेही सामील झाले होते. तर येथील शेतकऱ्यांंना पाण्यावाचून वंचीत ठेवल्याने आमदार भरणे यांनी पाण्याच्या व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या या रास्त मागणीला माझा पूर्ण पाठींबा आहे ,असे सांगीतले. या वेळी भरणे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांना संपर्क साधला. या वेळी परिसरातील शेतकरी कडक उन्हामध्ये मोठ्या संख्येने या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ लोकांनी महामार्ग रोखून धरला. शेवटी आमदार भरणे यांनी यांनी शेतकऱ्यांंशी चर्चा करून महामार्ग मोकळा केला. या वेळी पाटील यांनी देखील राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे व पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी संपर्क साधून वंचित शेतकऱ्यांना चालु आर्वतनातील पाणी तातडीने देण्याची मागणी केली.५४ फाट्यावरील शेतीला वेळेवर पाणी न मिळाल्याने गोतोंडी, निमसाखर, हगारेवाडी, शिरसटवाडी, घोरपडवाडी, दगडवाडी, जैनवाडीसह इतर गावातील पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला. केवळ तोंड बघून सध्या जलसंपदा विभागाचा कारभार चालू आहे. नीरा डावा कालव्यावरील ५४ फाट्याबरोबरच अन्य वितरीकेवरील पिकांना पाणी न मिळताच बंद झाले. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ््यांवर व इंदापूर तालुक्यावर शेतीच्या पाण्याच्या बाबतीत अन्याय झाला आहे. जलसंपदा विभागाने निरा डावा कालव्यातुन पुर्ण क्षमतेने पाणी आणून शेतीला तातडीने पाणी देण्याचे नियोजन करून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिलेच पाहीजे, अन्यथा पुणे येथील सिंचन भवनावरती शेतक ऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी मोर्चा काढण्याचा, इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी दिला.रास्ता रोको दरम्यान थोड्या उशिरा हर्षवर्धन पाटील यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची भेट घेउन पाठींबा व्यक्त केला. शेतकरी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली. या वेळी पाटील पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना भाटघर धरणाच्या नीरा डावा कालव्यातून येणारे पाणी हे उन्हाळी हंगामातील पिकांना देण्याचे नियोजनामध्ये ठरले आहे. फाटा क्र. ५४ वरील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी न मिळाल्यामुळे पिके पूर्णपणे जळालेली आहेत. भाटघरच्या धरणातील पाण्यावर इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी गेले कुठे? शेतीला पाणी का मिळत नाही? यास जबाबदार कोण आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी व्यक्त केली .