शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: May 28, 2017 03:49 IST

इंदापूर तालुक्यात सध्या पाणी पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . इंदापूर तालुक्यातील गोतंडी चोपनफाटा या फाट्यावरील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी

- लोकमत न्यूज नेटवर्क

निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यात सध्या पाणी पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . इंदापूर तालुक्यातील गोतंडी चोपनफाटा या फाट्यावरील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. त्यामुळे आज येथील शेतकऱ््यांनी इंदापूर बारामती राज्य महामार्ग सुमारे एक तासापेक्षा जादा वेळ रोखून धरला. आंदोलनामुळे राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.पाण्याअभावी शेतातील पिके पाण्यावाचून जळून चालली आहेत. लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. आज या रास्ता रोकोत इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणेही सामील झाले होते. तर येथील शेतकऱ्यांंना पाण्यावाचून वंचीत ठेवल्याने आमदार भरणे यांनी पाण्याच्या व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या या रास्त मागणीला माझा पूर्ण पाठींबा आहे ,असे सांगीतले. या वेळी भरणे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांना संपर्क साधला. या वेळी परिसरातील शेतकरी कडक उन्हामध्ये मोठ्या संख्येने या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ लोकांनी महामार्ग रोखून धरला. शेवटी आमदार भरणे यांनी यांनी शेतकऱ्यांंशी चर्चा करून महामार्ग मोकळा केला. या वेळी पाटील यांनी देखील राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे व पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी संपर्क साधून वंचित शेतकऱ्यांना चालु आर्वतनातील पाणी तातडीने देण्याची मागणी केली.५४ फाट्यावरील शेतीला वेळेवर पाणी न मिळाल्याने गोतोंडी, निमसाखर, हगारेवाडी, शिरसटवाडी, घोरपडवाडी, दगडवाडी, जैनवाडीसह इतर गावातील पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला. केवळ तोंड बघून सध्या जलसंपदा विभागाचा कारभार चालू आहे. नीरा डावा कालव्यावरील ५४ फाट्याबरोबरच अन्य वितरीकेवरील पिकांना पाणी न मिळताच बंद झाले. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ््यांवर व इंदापूर तालुक्यावर शेतीच्या पाण्याच्या बाबतीत अन्याय झाला आहे. जलसंपदा विभागाने निरा डावा कालव्यातुन पुर्ण क्षमतेने पाणी आणून शेतीला तातडीने पाणी देण्याचे नियोजन करून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिलेच पाहीजे, अन्यथा पुणे येथील सिंचन भवनावरती शेतक ऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी मोर्चा काढण्याचा, इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी दिला.रास्ता रोको दरम्यान थोड्या उशिरा हर्षवर्धन पाटील यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची भेट घेउन पाठींबा व्यक्त केला. शेतकरी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली. या वेळी पाटील पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना भाटघर धरणाच्या नीरा डावा कालव्यातून येणारे पाणी हे उन्हाळी हंगामातील पिकांना देण्याचे नियोजनामध्ये ठरले आहे. फाटा क्र. ५४ वरील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी न मिळाल्यामुळे पिके पूर्णपणे जळालेली आहेत. भाटघरच्या धरणातील पाण्यावर इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी गेले कुठे? शेतीला पाणी का मिळत नाही? यास जबाबदार कोण आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी व्यक्त केली .