शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

जिथे पाणी पडेल, तिथेच पाणी आडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:16 IST

हरिभाऊ बागडे : शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन्मान सोहळा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माणसाचा ...

हरिभाऊ बागडे : शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन्मान सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : माणसाचा जगण्याचा आधार शेती आहे. तसेच शेती पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करायला हवा. निसर्गाचे पडलेले पाणी अडवले पाहिजे. त्यासाठी केवळ विशिष्ट जागा पाहून तिथेच पाणी न अडवता. जिथे पाणी पडेल तिथेच आडवा. भूजलात पाणी जिरले तरच नद्या खळाळून वाहतील, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार हरिभाऊ बागडे यांनी पुणे येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र विकास केंद्र जल जागरूकता अभियान अंतर्गत शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सपत्निक सन्मान विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गोमुख ट्रस्टचे अध्यक्ष विजय परांजपे, महाराष्ट्र विकास केंद्राचे अनिल पाटील, शरद मांडे आदी उपस्थित होते.

''महाराष्ट्राचे भूजल'' या चर्चासत्रात भूजल अभ्यासक श्रीनिवास वडगबाळकर, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे राज्य समन्वयक धोंडीराम वारे यांनी याप्रसंगी विचार मांडले. या वेळी जलसाक्षरता विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

हरिभाऊ बागडे म्हणाले, महाराष्ट्र अन्न-धान्यात स्वयंपूर्ण नाही. आपण केवळ साखर, कापूस यात स्वयंपूर्ण आहोत. आपल्याला मूलभूत गरजा भागविण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे. यासाठी खूप काम करावे लागणार आहे. त्यासाठी शासन अथवा खासगी स्तरावर नियम धरून चालणार नाही. तर लोकांचे समाधान कशात आहे. ते पाहून त्यासाठी नियम बाजूला ठेवून काम करावे लागणार आहे.

श्रीनिवास वडगबाळकर म्हणाले, की देशातील धारणांपैकी एकूण ४० टक्के धरणे आपल्या महाराष्ट्रात आहे. मात्र, तरीही परिस्थिती बदलली नाही. भूजलचे खडक आणि वाळू हे दोनच प्रकार आहे. त्यामुळे पाणी साठवणे, भूजल वाढवणे यासाठी काम करावे लागेल. त्याचबरोबर साठवलेल्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागेल.

----

भूजल पातळी वाढवण्यासाठी राज्यात खूप काम करण्याची गरज : खानापूरकर

धुळे जिल्ह्यातील आदिवासी भागात काम करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा मोठा सन्मान केला. मात्र, हा माझा एकट्याचा सन्मान नसून यासाठी माजी आमदार अमरीश पटेल यांनी मोठे अर्थसहाय्य केले. तसेच माझी पत्नी माधुरी खानापूरकर यांनी मोठे पाठबळ दिले. हा पुरस्कार त्यांना अर्पण करतो, असे सांगून सुरेश खानापूरकर म्हणाले, की नोकरीनिमित्त मी महाराष्ट्रभर फिरलो. राज्यातील बहुतांश धरणाचे पाणी हे शहर आणि उद्योगांना दिले जात आहे. भविष्यात त्यामुळे शेतीला पाणी मिळणार नाही. पावसाचे पडणारे पाणी प्रत्येक गावागावाला कसे पुरेल यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. विशेषतः विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यात खारपण पट्टा मोठा आहे. तिथे भूजलात पाणी जिरत नाही. त्याठिकाणी पाणी जिरावण्यासाठी विविध उपक्रम हाती घ्यावी लागेल.

फोटो ओळ : शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सपत्निक सन्मान विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विजय परांजपे, श्रीनिवास वडगबाळकर, धोंडीराम वारे, अनिल पाटील, शरद मांडे आदी उपस्थित होते.