शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

तासभर रस्ता रोखला

By admin | Updated: May 15, 2016 00:44 IST

चासकमान डाव्या कालव्याचे आवर्तनाचे पाणी टेल टू हेड सोडावे, यासाठी शिरूरच्या पूर्वभागात न्हावरे तसेच आंबळे येथील

न्हावरे : चासकमान डाव्या कालव्याचे आवर्तनाचे पाणी टेल टू हेड सोडावे, यासाठी शिरूरच्या पूर्वभागात न्हावरे तसेच आंबळे (ता.शिरूर) येथील शेतकऱ्यांनी एकाच वेळी शिरूर-चौफुला हा राज्यमार्ग अडवून तासभर रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनामुळे संबंधित प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबवर रांगा लागल्याने अनेक वाहनचालक व प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती.या आंदोलनामध्ये उपसरपंच सागरराजे निंबाळकर, अपंग मित्र मंडळाचे अध्यक्ष पोपटराव थिटे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष सुभाष कांडगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेव जाधव, माजी सरपंच संभाजी बिडगर, अरुण तांबे, शरद पवार, विघ्नहर पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी खंडागळे, न्हावरे सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश बहिरट, सुरेश खंडागळे, विश्वासराजे निंबाळकर, सुरेश कोरेकर, जगन्नाथ मोरे, गणेश दरेकर, रणजित गेलोत, युवराज निंबाळकर, अनिल ठिकेकर, अमोल गावडे, अनिल जाधव, भास्करराव भोंडवे, अमोल कांगुणे, दीपक खंडागळे आदी शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)‘टेल टू हेड’चा नियम डावललागेल्या काही दिवसांपासून शिरूर व खेड तालुक्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन चासकमानच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडले आहे. मात्र, टेल टू हेड हा पाणी सोडण्याचा नियम डावलून संबंधित अधिकारी मध्येच पाणी सोडत आहेत. पाणी जर वरच्याच भागात प्रथम सुटले, तर टेलकडील भागात पाणी केव्हा जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही आवर्तनांमध्ये टेलकडील भागावर सतत अन्याय केला जात आहे. याला जबाबदार अधिकारी व कर्मचारी वर्गच आहे. गुन्हे दाखल कराटेल भागाकडील शेतकरी -अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तीव्र नाराज आहे. यांच्यामुळेच न्हावरे परिसरावर अन्याय होत आहे व त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. किमान या आवर्तनात पाणी सर्वांना मिळेल, ही अपेक्षा होती. परंतु वरच्याच भागात पाणी मुरत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याने आज शिरूर-चौफुला रस्त्यावर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा व गुन्हे दाखल करा, अशी मागणी शिरूरचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे संतप्त अधिकाऱ्यांनी केली.