शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको

By admin | Updated: March 27, 2017 02:01 IST

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी. शेतमालाला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी कॉँग्रेसचे भोर, वेल्हा व मुळशीचे

नसरापूर : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी. शेतमालाला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी कॉँग्रेसचे भोर, वेल्हा व मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्यासह १९ आमदारांनी विधिमंडळात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केल्यामुळे त्यांचे ३१ डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आले होते. याकरिता आज नसरापूर येथील चेलाडी फाटा येथे भाजपा सरकारचा निषेध करीत पुणे-सातारा महामार्ग रोखण्यात आला. या रास्ता रोकोच्या वेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.नसरापूर येथील चेलाडी फाटा येथे काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सकाळी ११:३० वाजता सुमारे १० मिनिटे महामार्ग रोखला. या वेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांच्यासह भोर तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, काँग्रेसचे जि. प. गटनेते विठ्ठल आवाळे, दिलीप बाठे, उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, वेल्हा तालुकाध्यक्ष नाना राऊत, सोपान म्हस्के, रोहन बाठे, गीतांजली शेटे, आशाताई रेणुसे, दिनकर धरपाळे, पोपटराव सुके, संतोष सोंडकर, मदन खुटवड, बाबू झोरे, अरविंद सोंडकर, संदीप चक्के, दत्ता बाठे, महेश टापरे, आकाश वाडघरे, सुभाष कोंढाळकर, इरफान मुलाणी उपस्थित होते.या वेळी आमदार कारवाईच्या निषेधार्थ भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी जिल्हाध्यक्ष संजय जगताप, शैलेश सोनवणे आदींनी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह सर्व आमदारांचे निलंबन सरकारने मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण-पाटील व राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. कर्जमाफी घोषणा न झाल्यानेच आंदोलनआंदोलन करणाऱ्या लोकप्रतिििनधींना बेकायशीरपणे निलंबित करून शेतकरीबांधवांचा व लोकप्रतिनिधींचा आवाज ठोकशाहीने चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा भोर, वेल्हा व मुळशी तालुका काँग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने जोरदार निषेध नोंदवून निलंबन रद्द करण्याची मागणी करण्यात आली. निलंबनाची कारवाई रद्द न झाल्यास आणि अजूनही कर्जमाफी घोषणा न झाल्यानेच नसरापूर येथील चेलाडी फाटा येथे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांशी सरकारचा कृतघ्नपणा : प्रवीण मानेइंदापूर : शेतकरी हा लोकजीवनाचा केंद्रबिंदू आहे. त्याचे जगणे सुसह्य होण्यासाठी कर्जमाफीसारख्या सवलती त्याला मिळाल्याच पाहिजेत. मात्र, त्या न देता, तशी मागणी करणाऱ्या दत्तात्रय भरणे व इतर लोकप्रतिनिधींना निलंबित करून राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांशी, इथल्या मातीशी कृतघ्नपणा करत आहे, अशी टीका जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी वरकुटे बुद्रुक येथे बोलताना केली.एका खासगी उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. माने म्हणाले की, आमदार निलंबनाचे परिणाम भाजप सरकारला भोगावे लागतील. सध्या सोलापूरसाठी नदीतून व सिनामाढा बोगद्यातून उजनी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरण झपाट्याने खाली होत आहे. त्याबाबत सरकारने इंदापूरकराचा विचार करावा. त्यांचे हक्काचे पाणी आरक्षित करावे, अशी मागणी त्यांनी केली. सूरज शिंदे, राजेंद्र गोलांडे, आबा करे, भाऊ देवकर, दादा कुंभार, पप्पू घोडके, तुषार पाटील, हरिश्चंद्र देवकर आदी उपस्थित होते.