शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको

By admin | Updated: March 27, 2017 02:01 IST

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी. शेतमालाला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी कॉँग्रेसचे भोर, वेल्हा व मुळशीचे

नसरापूर : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी. शेतमालाला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी कॉँग्रेसचे भोर, वेल्हा व मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्यासह १९ आमदारांनी विधिमंडळात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केल्यामुळे त्यांचे ३१ डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आले होते. याकरिता आज नसरापूर येथील चेलाडी फाटा येथे भाजपा सरकारचा निषेध करीत पुणे-सातारा महामार्ग रोखण्यात आला. या रास्ता रोकोच्या वेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.नसरापूर येथील चेलाडी फाटा येथे काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सकाळी ११:३० वाजता सुमारे १० मिनिटे महामार्ग रोखला. या वेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांच्यासह भोर तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, काँग्रेसचे जि. प. गटनेते विठ्ठल आवाळे, दिलीप बाठे, उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, वेल्हा तालुकाध्यक्ष नाना राऊत, सोपान म्हस्के, रोहन बाठे, गीतांजली शेटे, आशाताई रेणुसे, दिनकर धरपाळे, पोपटराव सुके, संतोष सोंडकर, मदन खुटवड, बाबू झोरे, अरविंद सोंडकर, संदीप चक्के, दत्ता बाठे, महेश टापरे, आकाश वाडघरे, सुभाष कोंढाळकर, इरफान मुलाणी उपस्थित होते.या वेळी आमदार कारवाईच्या निषेधार्थ भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी जिल्हाध्यक्ष संजय जगताप, शैलेश सोनवणे आदींनी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह सर्व आमदारांचे निलंबन सरकारने मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण-पाटील व राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. कर्जमाफी घोषणा न झाल्यानेच आंदोलनआंदोलन करणाऱ्या लोकप्रतिििनधींना बेकायशीरपणे निलंबित करून शेतकरीबांधवांचा व लोकप्रतिनिधींचा आवाज ठोकशाहीने चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा भोर, वेल्हा व मुळशी तालुका काँग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने जोरदार निषेध नोंदवून निलंबन रद्द करण्याची मागणी करण्यात आली. निलंबनाची कारवाई रद्द न झाल्यास आणि अजूनही कर्जमाफी घोषणा न झाल्यानेच नसरापूर येथील चेलाडी फाटा येथे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांशी सरकारचा कृतघ्नपणा : प्रवीण मानेइंदापूर : शेतकरी हा लोकजीवनाचा केंद्रबिंदू आहे. त्याचे जगणे सुसह्य होण्यासाठी कर्जमाफीसारख्या सवलती त्याला मिळाल्याच पाहिजेत. मात्र, त्या न देता, तशी मागणी करणाऱ्या दत्तात्रय भरणे व इतर लोकप्रतिनिधींना निलंबित करून राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांशी, इथल्या मातीशी कृतघ्नपणा करत आहे, अशी टीका जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी वरकुटे बुद्रुक येथे बोलताना केली.एका खासगी उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. माने म्हणाले की, आमदार निलंबनाचे परिणाम भाजप सरकारला भोगावे लागतील. सध्या सोलापूरसाठी नदीतून व सिनामाढा बोगद्यातून उजनी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरण झपाट्याने खाली होत आहे. त्याबाबत सरकारने इंदापूरकराचा विचार करावा. त्यांचे हक्काचे पाणी आरक्षित करावे, अशी मागणी त्यांनी केली. सूरज शिंदे, राजेंद्र गोलांडे, आबा करे, भाऊ देवकर, दादा कुंभार, पप्पू घोडके, तुषार पाटील, हरिश्चंद्र देवकर आदी उपस्थित होते.