शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आता अस्थिरता थांबवा; ‘बजेट’चे पाहा!

By admin | Updated: February 8, 2016 02:08 IST

निवडणूक आचारसंहिता, ई- टेंडरिंग, पंचायत राज कमिटी व जिल्हा परिषदेतील पदाधिकारीबदल या कचाट्यात सापडलेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला आता

पुणे : निवडणूक आचारसंहिता, ई- टेंडरिंग, पंचायत राज कमिटी व जिल्हा परिषदेतील पदाधिकारीबदल या कचाट्यात सापडलेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला आता तरी गती मिळणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेने २०१५-१६ चा १७८ कोटी ५० लाखांचा, तर पुरवणी ४५ कोटी ७५ लाखांचे मिळून २२४ कोटी २५ लाखांचे अंदाजपत्रक मांडले खरे; मात्र सुरुवातीपासूनच आलेल्या अडथळ्यांमुळे दहा महिने उलटूनही ३० टक्के खर्चही करता आला नाही. त्यात कारभारी बदलाच्या चर्चेत दोन महिने गेले. त्यामुळे अस्थिर अवस्था झालेल्या जिल्हा परिषदेचे बजेट मात्र अद्याप कागदावरच आहे, असे चित्र आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर ९४ टक्के खर्च झाला होता. आता फेबु्रवारीचा पहिला आठवडा झाला तरी कसाबसा ३० टक्केपर्यंत खर्च झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जिल्हा परिषदेने केलेल्या अर्थसंकल्पातील घोषणा अद्याप कागदावरच आहेत. विधानसभा निवडणुका व त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांच्या आचारसंहिता लागल्या. त्यात पंचायत राज कमिटी आली. त्याची तयारी व नंतर साक्ष देण्यासाठी असे यात चार ते पाच महिने गेले. याचा प्रशासनावर प्रचंड ताण आला. तसेच यापूर्वी शासन निर्णयाप्रमाणे १५ लाखांपर्यंत कामे ग्रामपंचायतीला देता येत होती. आता ३ लाखांपुढील कामे निविदा काढूनच करावी लागत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागावर प्रचंड लोड आला आहे. याचा परिणाम बजेटवर झाला. यातच डिसेंबरपासून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सव्वा वर्षाची मुदत संपल्याची आठवण इच्छुकांनी केली. कामाला कुठे गती मिळते तोच खो मिळाला. तेव्हापासून आज उद्या करीत करीत हे प्रकरण तीन महिने अधूनमधून पुढे येत राहिले. अखेर फेब्रुवारी उजाडला आणि पक्षनेते अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर तीन-चार दिवस राजीनामानाट्य घडले. तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांची जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन २२ ते २३ सदस्यांच्या सह्यांचे निवेदन दिले आणि आता बदल कसा मारक ठरू शकतो, हे निदर्शनास आणले. त्यानंतर दोन दिवस आता बदल होणे नाही, अशी चर्चा सुरू आहे. आता बदलाची अस्थिरता थांबवा आणि कामं करा, अशी स्थिती जिल्ह्यातून उपस्थित होत आहे. तुमचे पक्षनेते जेव्हा निर्णय घेतील तेव्हा घेऊ द्या, पण आता ५० ते ५५ दिवस राहिलेत, अर्थसंकल्प कसा मार्गी लागेल हे पाहा!