शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

मानधनाअभावी होडी बंद

By admin | Updated: June 17, 2015 23:22 IST

वहानगाव ते माळेगावच्या दरम्यान ठोकळवाडी जलाशयातील ‘नाव’(होडी) सेवा नावाड्याअभावी बंद आहे. मागील पाच वर्षांपासून वारंवार

कामशेत : वहानगाव ते माळेगावच्या दरम्यान ठोकळवाडी जलाशयातील ‘नाव’(होडी) सेवा नावाड्याअभावी बंद आहे. मागील पाच वर्षांपासून वारंवार नावाड्याच्या मानधनाचा प्रश्न पुढे येऊनही सेवा खंडित होत आहे.सन १९२२ च्या सुमारास दि टाटा पॉवर सप्लाय कंपनीने वीजनिर्मितीसाठी इंद्रायणीनदीवर वडेश्वर गावाजवळ ठोकळवाडी धरण बांधले. आंदर मावळातील सह्याद्री डोंगर पठार आणि शिवारातील पाण्याच्या धरणात साठा वाढला. या पाण्यावर भिवपुरीजवळ टाटाचा वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला. या विजेवर मुंबई शहराला वीजपुरवठा होत आहे.धरणातील पाणीसाठ्यामुळे आंदर मावळातील पश्चिम भागातील धरणाच्या अलीकडे आणि पलीकडे अशा दोन भागांत विभागणी झाली. वडेश्वर, सटवाईवाडी, शिंदेवाडी, घाटेवाडी, वहानगाव, नागायली, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहुली, बेंदेवाडी, कुसुर या गावांना धरणापलीकडील माळेगाव, परी, तळपेवाडी, माळेगाव बुद्रुक, कुणे, अनसुटे, पारीठेवाडी, इंगळुण या गावांना जोडण्यासाठी माळेगाव ते वहानगाव दरम्यान नावेची व्यवस्था करण्यात आली.या गावातील सोयरसंबंध आणि नातीगोती या नावेतील रेशमगाठीने अधिक घट्ट झाली. माहेरवासीण सुना, लेकी अलीकडे पलीकडे जाऊ लागल्या. सुख-दु:खाला सोयरे धावू लागले. वीस वर्षांपूर्वी आंदरमावळ सहकारी दूधउत्पादक संस्थेला होणारा धरणापलीकडील दूधउत्पादकांचा दूधपुरवठा याच नावेतून होत होता, तर वरसुबाई या देवस्थानाच्या दर्शनासाठी शेकडो भाविक याच नावेतून प्रवास करून जात होते.नावाड्याच्या तीन पिढ्या नावेवर राबत होत्या. कै. रूपा शिवा बोऱ्हाडे यानंतर त्यांचा मुलगा कै. चंदर रुपा बोऱ्हाडे आणि आता नातू मारुती चंदर बोऱ्हाडे नाव चालवत आहेत. यापैकी रुपा बोऱ्हाडे आणि चंदर बोऱ्हाडे यांना जिल्हा परिषदेच्या कामगारांच्या दर्जानुसार मानधन दिले जायचे. यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता.सकाळी सात ते सायंकाळी सात अशा बारा तास बोऱ्हाडे कुटुंबीय या परिसरातील प्रवाशांची सेवा करीत होते. या नावेतूनच लग्नाचे वऱ्हाड त्यांनी पाहिले. प्रसूतीसाठी महिला नावेत बसून वडेश्वरला रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. अंत्यविधी, दशक्रिया, बारसे, यात्रा, जत्रा या समारंभाला नागरिकांचे येथे जाणे होते.मात्र चंदर बोऱ्हाडे यांच्या मृत्यूनंतर नावाड्याच्या मानधनावरून प्रश्न निर्माण होऊन काही काळ जि. प. येथे शासकीय लाँच ठेवली. मात्र त्यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागली. तेही स्थानिक नसल्याने कधी वेळेवर पोहोचत नव्हते. लाँच बंद पडून पुन्हा नव्याने नावेची व्यवस्था झाली. मात्र, नावाड्याच्या मानधनाचा प्रश्न पुढे आला. (वार्ताहर)