शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
5
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
6
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
7
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
8
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
9
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
10
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

मानधनाअभावी होडी बंद

By admin | Updated: June 17, 2015 23:22 IST

वहानगाव ते माळेगावच्या दरम्यान ठोकळवाडी जलाशयातील ‘नाव’(होडी) सेवा नावाड्याअभावी बंद आहे. मागील पाच वर्षांपासून वारंवार

कामशेत : वहानगाव ते माळेगावच्या दरम्यान ठोकळवाडी जलाशयातील ‘नाव’(होडी) सेवा नावाड्याअभावी बंद आहे. मागील पाच वर्षांपासून वारंवार नावाड्याच्या मानधनाचा प्रश्न पुढे येऊनही सेवा खंडित होत आहे.सन १९२२ च्या सुमारास दि टाटा पॉवर सप्लाय कंपनीने वीजनिर्मितीसाठी इंद्रायणीनदीवर वडेश्वर गावाजवळ ठोकळवाडी धरण बांधले. आंदर मावळातील सह्याद्री डोंगर पठार आणि शिवारातील पाण्याच्या धरणात साठा वाढला. या पाण्यावर भिवपुरीजवळ टाटाचा वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला. या विजेवर मुंबई शहराला वीजपुरवठा होत आहे.धरणातील पाणीसाठ्यामुळे आंदर मावळातील पश्चिम भागातील धरणाच्या अलीकडे आणि पलीकडे अशा दोन भागांत विभागणी झाली. वडेश्वर, सटवाईवाडी, शिंदेवाडी, घाटेवाडी, वहानगाव, नागायली, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहुली, बेंदेवाडी, कुसुर या गावांना धरणापलीकडील माळेगाव, परी, तळपेवाडी, माळेगाव बुद्रुक, कुणे, अनसुटे, पारीठेवाडी, इंगळुण या गावांना जोडण्यासाठी माळेगाव ते वहानगाव दरम्यान नावेची व्यवस्था करण्यात आली.या गावातील सोयरसंबंध आणि नातीगोती या नावेतील रेशमगाठीने अधिक घट्ट झाली. माहेरवासीण सुना, लेकी अलीकडे पलीकडे जाऊ लागल्या. सुख-दु:खाला सोयरे धावू लागले. वीस वर्षांपूर्वी आंदरमावळ सहकारी दूधउत्पादक संस्थेला होणारा धरणापलीकडील दूधउत्पादकांचा दूधपुरवठा याच नावेतून होत होता, तर वरसुबाई या देवस्थानाच्या दर्शनासाठी शेकडो भाविक याच नावेतून प्रवास करून जात होते.नावाड्याच्या तीन पिढ्या नावेवर राबत होत्या. कै. रूपा शिवा बोऱ्हाडे यानंतर त्यांचा मुलगा कै. चंदर रुपा बोऱ्हाडे आणि आता नातू मारुती चंदर बोऱ्हाडे नाव चालवत आहेत. यापैकी रुपा बोऱ्हाडे आणि चंदर बोऱ्हाडे यांना जिल्हा परिषदेच्या कामगारांच्या दर्जानुसार मानधन दिले जायचे. यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता.सकाळी सात ते सायंकाळी सात अशा बारा तास बोऱ्हाडे कुटुंबीय या परिसरातील प्रवाशांची सेवा करीत होते. या नावेतूनच लग्नाचे वऱ्हाड त्यांनी पाहिले. प्रसूतीसाठी महिला नावेत बसून वडेश्वरला रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. अंत्यविधी, दशक्रिया, बारसे, यात्रा, जत्रा या समारंभाला नागरिकांचे येथे जाणे होते.मात्र चंदर बोऱ्हाडे यांच्या मृत्यूनंतर नावाड्याच्या मानधनावरून प्रश्न निर्माण होऊन काही काळ जि. प. येथे शासकीय लाँच ठेवली. मात्र त्यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागली. तेही स्थानिक नसल्याने कधी वेळेवर पोहोचत नव्हते. लाँच बंद पडून पुन्हा नव्याने नावेची व्यवस्था झाली. मात्र, नावाड्याच्या मानधनाचा प्रश्न पुढे आला. (वार्ताहर)