शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

‘त्या’ गुळाचे वाटप थांबवा

By admin | Updated: June 17, 2016 05:07 IST

जोपर्र्यंत चौकशी समितीचा अहवाल येत नाही, तोपर्र्यंत त्या गुळाचे अंगणवाडीतील बालकांना वाटप करू नये, असे आदेश गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

पुणे : जोपर्र्यंत चौकशी समितीचा अहवाल येत नाही, तोपर्र्यंत त्या गुळाचे अंगणवाडीतील बालकांना वाटप करू नये, असे आदेश गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील तब्बल साडेचार हजारपेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांना पोषण आहारामध्ये गूळ पावडरचे वाटप करण्यात येते. चक्क हातभट्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या गुळाचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक बाब जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत निदर्र्शनास आणून दिली होती. या वेळी गूळ खाल्ल्यावर एका पदाधिकाऱ्याला करंट लागला.... महिला सदस्यांना तरतरी आली.... तर एका सदस्याने डोक्यात झटका बसल्याच्या प्रतिक्रिया सभेतच सदस्यांनी दिल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी वाटप करण्यात आलेल्या गुळाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नेमण्यात आली आहे. यात एक अन्न व औषध प्रशासन अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व उरुळी कांचनच्या सुपरवायझर यांचा समावेश आहे. हा गूळ दोन महिन्यांपूर्वी एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी वाटप करण्यात आला होता. मेनंतर मुलांना सुट्टी असल्याने पुढील वाटप झाले नव्हते. आता स्थायी समितीत सदस्यांनी हा गूळ निकृष्ट असल्याचा आरोप केल्याने चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत हा गूळ अंगणवाडीतील मुलांना वाटप करू नये, असे आदेश दौलत देसाई यांनी आज महिला व बालकल्याण विभागाला दिले आहेत. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता, गुळाच्या पावडरचे दोन महिन्यांपूर्वी वाटप करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश आम्ही पुढे दिले आहेत, असे सांगितले. (प्रतिनिधी)सर्वसाधारण सभा गाजणारयेत्या शनिवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत असून, या गूळ प्रकरणामुळे गाजण्याची शक्यता आहे. तसेच निवडणुका जवळ आल्याने विरोधक आक्रमक होत असल्याने येत्या सभेत अनेक प्रकरणे बाहेर काढणार असल्याचे काही जणांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आम्ही केलेल्या मागणीनुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली असून, वाटप थांबविले आहे. याचे स्वागत करतो. मात्र, वाटप थांबविण्यापेक्षा अंगणवाडीत गेलेला माल तेथून उचलून परत मागवायला हवा. - दशरथ काळभोर, जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना