शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

दगडी चौथऱ्याची तोडफोड

By admin | Updated: April 4, 2016 01:23 IST

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या पुरातन गडकोटातील मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस असलेल्या दगडी चौथऱ्यावर मेघडंबरी उभारून तेथे

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या पुरातन गडकोटातील मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस असलेल्या दगडी चौथऱ्यावर मेघडंबरी उभारून तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारण्यासाठी चौथऱ्याची तोडफोड सुरू असून, चौथऱ्याच्या दगडाच्या पहिल्याच थराखाली चुनखडी-विटांमध्ये त्याकाळात तयार केलेली पाण्याची टाकी खुली झाली असून, त्यामध्ये पाणी आढळून आले, त्याचबरोबर दगडी मूर्ती व चुनखडीतून तयार केलेली शिवपिंड सापडली आहे.गेल्या चार-पाच वर्षांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींचा पुतळा गडकोटांमधील याच दगडी चौथऱ्यावर उभारण्याचे काम सध्याच्या विश्वस्त मंडळींनी हाती घेतले. त्यासाठी या चौथऱ्याची तोडफोड करण्यात येत होती. पहिलाच थर उखडल्यानंतर असा प्रकार निदर्शनास आल्याने सदर काम थांबविण्यात आले आहे. यामुळे नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू झाली असून, गडकोटांच्या व जेजुरीनगरीच्या विकासाच्या शिल्पकार अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा गडकोट आवारात उभारला जाणे, ही बाब स्वागतार्ह असली, तरी त्यासाठी भक्कम दगडी चौथऱ्याची तोडफोड करणे योग्य आहे काय? आढळून आलेली मूर्ती, शिवपिंड आणि पाण्याची टाकी याचे नेमके महत्त्व काय असावे? व ते याच ठिकाणी ठेवण्यामागचा उद्धेश काय असावा? याला काहीतरी धार्मिक आधार असावा, अशीच चर्चा सर्वत्र आहे. या संदर्भात अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्यासाठी अत्यंत आग्रही असणारे देव संस्थानचे विश्वस्त संदीप घोणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, या ठिकाणी पाण्याची टाकी होती. ती उघडी असल्याने यात्रा व गर्दीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंधरा-वीस वर्षांपूर्वी तत्कालीन विश्वस्त मंडळाने तिच्यावर फरशी बसवून ती बंदिस्त केली होती. यामुळे येथे काही चुकीचे झालेले आहे असे आजिबात नाही. मात्र, याबाबतची संपूर्ण माहिती घेतली जाईल. ब्रांझ धातूपासून तयार केलेली अहिल्यादेवींची मूर्ती या ठिकाणी बसवण्याचा आम्ही सर्व विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला होता. यापूर्वीच्या कोणत्यानी विश्वस्त मंडळाने गडकोटात तोडफोडीचा निर्णय घेतलेला नव्हता, उलट दुरुस्त्याच केलेल्या आहेत. या विश्वस्त मंडळाने मात्र पूर्ण माहिती न घेता ऐतिहासिक वास्तूची रचनाच बदलण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचीच चर्चा अधिक आहे.