शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

दगडी चौथऱ्याची तोडफोड

By admin | Updated: April 4, 2016 01:23 IST

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या पुरातन गडकोटातील मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस असलेल्या दगडी चौथऱ्यावर मेघडंबरी उभारून तेथे

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या पुरातन गडकोटातील मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस असलेल्या दगडी चौथऱ्यावर मेघडंबरी उभारून तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारण्यासाठी चौथऱ्याची तोडफोड सुरू असून, चौथऱ्याच्या दगडाच्या पहिल्याच थराखाली चुनखडी-विटांमध्ये त्याकाळात तयार केलेली पाण्याची टाकी खुली झाली असून, त्यामध्ये पाणी आढळून आले, त्याचबरोबर दगडी मूर्ती व चुनखडीतून तयार केलेली शिवपिंड सापडली आहे.गेल्या चार-पाच वर्षांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींचा पुतळा गडकोटांमधील याच दगडी चौथऱ्यावर उभारण्याचे काम सध्याच्या विश्वस्त मंडळींनी हाती घेतले. त्यासाठी या चौथऱ्याची तोडफोड करण्यात येत होती. पहिलाच थर उखडल्यानंतर असा प्रकार निदर्शनास आल्याने सदर काम थांबविण्यात आले आहे. यामुळे नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू झाली असून, गडकोटांच्या व जेजुरीनगरीच्या विकासाच्या शिल्पकार अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा गडकोट आवारात उभारला जाणे, ही बाब स्वागतार्ह असली, तरी त्यासाठी भक्कम दगडी चौथऱ्याची तोडफोड करणे योग्य आहे काय? आढळून आलेली मूर्ती, शिवपिंड आणि पाण्याची टाकी याचे नेमके महत्त्व काय असावे? व ते याच ठिकाणी ठेवण्यामागचा उद्धेश काय असावा? याला काहीतरी धार्मिक आधार असावा, अशीच चर्चा सर्वत्र आहे. या संदर्भात अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्यासाठी अत्यंत आग्रही असणारे देव संस्थानचे विश्वस्त संदीप घोणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, या ठिकाणी पाण्याची टाकी होती. ती उघडी असल्याने यात्रा व गर्दीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंधरा-वीस वर्षांपूर्वी तत्कालीन विश्वस्त मंडळाने तिच्यावर फरशी बसवून ती बंदिस्त केली होती. यामुळे येथे काही चुकीचे झालेले आहे असे आजिबात नाही. मात्र, याबाबतची संपूर्ण माहिती घेतली जाईल. ब्रांझ धातूपासून तयार केलेली अहिल्यादेवींची मूर्ती या ठिकाणी बसवण्याचा आम्ही सर्व विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला होता. यापूर्वीच्या कोणत्यानी विश्वस्त मंडळाने गडकोटात तोडफोडीचा निर्णय घेतलेला नव्हता, उलट दुरुस्त्याच केलेल्या आहेत. या विश्वस्त मंडळाने मात्र पूर्ण माहिती न घेता ऐतिहासिक वास्तूची रचनाच बदलण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचीच चर्चा अधिक आहे.