शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दगडी चौथऱ्याची तोडफोड

By admin | Updated: April 4, 2016 01:23 IST

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या पुरातन गडकोटातील मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस असलेल्या दगडी चौथऱ्यावर मेघडंबरी उभारून तेथे

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या पुरातन गडकोटातील मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस असलेल्या दगडी चौथऱ्यावर मेघडंबरी उभारून तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारण्यासाठी चौथऱ्याची तोडफोड सुरू असून, चौथऱ्याच्या दगडाच्या पहिल्याच थराखाली चुनखडी-विटांमध्ये त्याकाळात तयार केलेली पाण्याची टाकी खुली झाली असून, त्यामध्ये पाणी आढळून आले, त्याचबरोबर दगडी मूर्ती व चुनखडीतून तयार केलेली शिवपिंड सापडली आहे.गेल्या चार-पाच वर्षांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींचा पुतळा गडकोटांमधील याच दगडी चौथऱ्यावर उभारण्याचे काम सध्याच्या विश्वस्त मंडळींनी हाती घेतले. त्यासाठी या चौथऱ्याची तोडफोड करण्यात येत होती. पहिलाच थर उखडल्यानंतर असा प्रकार निदर्शनास आल्याने सदर काम थांबविण्यात आले आहे. यामुळे नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू झाली असून, गडकोटांच्या व जेजुरीनगरीच्या विकासाच्या शिल्पकार अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा गडकोट आवारात उभारला जाणे, ही बाब स्वागतार्ह असली, तरी त्यासाठी भक्कम दगडी चौथऱ्याची तोडफोड करणे योग्य आहे काय? आढळून आलेली मूर्ती, शिवपिंड आणि पाण्याची टाकी याचे नेमके महत्त्व काय असावे? व ते याच ठिकाणी ठेवण्यामागचा उद्धेश काय असावा? याला काहीतरी धार्मिक आधार असावा, अशीच चर्चा सर्वत्र आहे. या संदर्भात अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्यासाठी अत्यंत आग्रही असणारे देव संस्थानचे विश्वस्त संदीप घोणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, या ठिकाणी पाण्याची टाकी होती. ती उघडी असल्याने यात्रा व गर्दीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंधरा-वीस वर्षांपूर्वी तत्कालीन विश्वस्त मंडळाने तिच्यावर फरशी बसवून ती बंदिस्त केली होती. यामुळे येथे काही चुकीचे झालेले आहे असे आजिबात नाही. मात्र, याबाबतची संपूर्ण माहिती घेतली जाईल. ब्रांझ धातूपासून तयार केलेली अहिल्यादेवींची मूर्ती या ठिकाणी बसवण्याचा आम्ही सर्व विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला होता. यापूर्वीच्या कोणत्यानी विश्वस्त मंडळाने गडकोटात तोडफोडीचा निर्णय घेतलेला नव्हता, उलट दुरुस्त्याच केलेल्या आहेत. या विश्वस्त मंडळाने मात्र पूर्ण माहिती न घेता ऐतिहासिक वास्तूची रचनाच बदलण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचीच चर्चा अधिक आहे.